शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

जप्त केलेल्या मुद्देमालाचे वाटप

By admin | Updated: January 6, 2016 01:13 IST

शहरात घडलेल्या विविध गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी जप्त केलेल्या ऐवजाचे वाटप करण्यात आले. सानपाडा येथे झालेल्या या कार्यक्रमात ४१ जणांचा ६४

नवी मुंबई : शहरात घडलेल्या विविध गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी जप्त केलेल्या ऐवजाचे वाटप करण्यात आले. सानपाडा येथे झालेल्या या कार्यक्रमात ४१ जणांचा ६४ लाख २७ हजार ८३९ रुपये किमतीचा ऐवज परत देण्यात आला. यावेळी चोरीला गेलेला ऐवज परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू खुलले होते.शहरात गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासह घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यात नवी मुंबई पोलीस कौशल्य पणाला लावत आहेत. यानुसार गतकाळात पोलिसांनी अनेक गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमालही जप्त केलेला आहे. त्यानुसार चोरीला गेलेला हा ऐवज मंगळवारी सानपाडा येथे न्यायालयाच्या आदेशाने संबंधितांना परत देण्यात आला. महाराष्ट्र पोलिसांच्या स्थापना दिन निमित्ताने साजऱ्या होत असलेल्या सप्ताहांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ६४ लाख २७ हजार ८३९ रुपये किमतीचा ऐवज ४१ जणांना परत देण्यात आला. त्यामध्ये पोलिसांनी शिताफीने उकल केलेल्या अनेक गंभीर गुन्ह्यांचाही समावेश होता. जिल्हा सत्र न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश एम. सी. खडके, अपर पोलीस आयुक्त विजय चव्हाण, उपायुक्त सुरेश मेंगडे, साहाय्यक आयुक्त धनराज दायमा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी बदलत्या तंत्रज्ञानाप्रमाणे गुन्हेगारही गुन्ह्यासाठी आधुनिक पद्धतीचा वापर करीत असल्याचे सेवानिवृत्त न्यायाधीश एम. सी. खडके यांनी सांगितले. अशा गुन्हेगारांसोबत दोन हात करण्यासाठी करण्यासाठी पोलीसही झटत असतात. अशावेळी नागरिकांनीही पोलिसांवर विश्वास ठेवायला हवा, असेही त्यांनी सांगितले.चोरीला गेलेला ऐवज परत मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना काही नागरिकांनी पोलिसांना सिंघमची उपमा दिली. परंतु चित्रपटामध्ये आणि प्रत्यक्षात पोलिसांचे वास्तव्य भिन्न असल्याचे अपर आयुक्त विजय चव्हाण यांनी सांगितले. सिंघमप्रमाणे काम करणारे आमच्यातही आहेत, मात्र त्यांच्यावर गुन्हेगारांशी लढताना कायद्याचे बंधन असते. यामुळे चित्रपटातल्या पोलिसांप्रमाणे खऱ्या पोलिसांना वागता येत नसल्याचेही ते म्हणाले. गुन्ह्याचा पोलिसांनी तत्काळ उलगडा करावा, अशी नागरिकांची अपेक्षा असते. परंतु पोलिसांवरच जबाबदारी सोपवण्याऐवजी नागरिकांनीही कर्तव्याचे पालन करणे गरजेचे असल्याचे अपर आयुक्त चव्हाण यांनी सांगितले. गुन्हे टाळण्यासाठी पोलिसांनी शहरभर माहिती पत्रके वाटलेली आहेत. घरफोडी, सोनसाखळी चोरी तसेच सायबर गुन्ह्यांत फसवणूक व इतर गुन्हे टाळण्यासाठी घ्यायच्या खबरदारीची माहिती त्यामध्ये होती. तसेच भाडेकरू, कामगार व सुरक्षारक्षक ठेवताना त्याची माहिती पोलिसांना देण्याचेही आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आले होते. मात्र पोलीस पत्रके वाटून थकले तरीही स्वत:च्या संपत्तीची काळजी कशी घ्यायची, याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता झालेली नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. यामुळे घडलेल्या गुन्ह्यांची उकल केल्याबद्दल साधी कौतुकाची थाप मिळाली तरी पोलीस समाधानी असतात, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)