शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
4
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
5
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
7
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
8
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
9
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
10
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
11
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
12
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
13
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
14
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
15
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
16
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
17
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
18
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
19
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
20
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर

चिंताजनक! हवा प्रदूषणामुळे भारतात होतोय दर आठमधील एक मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 11:34 AM

भारतात होणाऱ्या दर आठ मृत्यूंपैकी एक मृत्यू हा हवा प्रदूषणामुळे होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष एका अहवालामधून समोर आला आहे. 

ठळक मुद्देप्रचंड वृक्षतोड, औद्योगिकीकरण आणि वाहनांची मोठ्या प्रमाणात वाढलेली संख्या यामुळे गेल्या काही वर्षांत भारतातील वायू प्रदूषण वाढले आहे भारतात होणाऱ्या दर आठ मृत्यूंपैकी एक मृत्यू हा वायू प्रदूषणामुळे होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष एका अहवालामधून समोर आला आहे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमएमआर) ने  प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये हा दावा करण्यात आला आहे

नवी दिल्ली - प्रचंड वृक्षतोड, औद्योगिकीकरण आणि वाहनांची मोठ्या प्रमाणात वाढलेली संख्या यामुळे गेल्या काही वर्षांत भारतातील वायू प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे भारतात होणाऱ्या दर आठ मृत्यूंपैकी एक मृत्यू हा हवा प्रदूषणामुळे होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष एका अहवालामधून समोर आला आहे.  इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमएमआर) ने  प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये हा दावा करण्यात आला आहे. अशा प्रकारचा संशोधन होण्याची होण्याची भारतातील ही पहिलीच वेळ असून, यामध्ये प्रदूषित हवेमुळे होणारे मृत्यू आणि प्रदूषणाचा आजार आणि आयुर्मानावर होणारा परिणाम यांचा अभ्यास करण्यात आला आहे. प्रदूषणामुळे भारतातील लोकांचे सरासरी  आयुर्मान घटत असून, शुद्ध हवा मिळाली असती तर यापैकी अनेकांचे आयुर्मान हे एक वर्ष सात महिन्यांनी वाढले असते, असा निष्कर्ष या अहवालातून काढण्यात आला आहे. भारतातील 77 टक्के लोकसंख्या वायू प्रदूषणाच्या विळख्यात असून, हे प्रदूषण तंबाखूपासून असलेल्या धोक्यापेक्षा अधिक धोकादायक ठरत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.  तंबाखूचे कोणत्याही स्वरूपातील सेवन हे आरोग्यासाठी हानीकारक असते. त्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका उदभवतो. मात्र नव्या अभ्यासानुसार तंबाखूमुळे असलेल्या आजारांच्या धोक्यापेक्षा  प्रदूषणामुळे निर्माण होणारा आजारपणांचा धोका अधिक आहे. तसेच गतवर्षी 2017 मध्ये भारतात 17.4 लाख लोकांच्या मृत्यूसाठी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात वायू प्रदूषण जबाबदार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अभ्यासानुसार, लोअर रेस्पिरेटरी इन्फ्लेक्शनची तुलना केल्यास ही तंबाखूपेक्षा वायू प्रदूषणामुळे होत आहे. केवळ फुफ्फुसाचा कर्करोग हा तंबाखूमुळे अधिक होत आहे. प्रति एक लाख व्यक्तींमागे 49 जणांना वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होत आहे. तर तंबाखूमुळे  62 जणांना फुफ्फुसाचा कर्करोग होत आहे.  तसेच वायूप्रदूषणामुळे गर्भतापाचा धोकाही वाढला असल्याचे अमेरिकेतील यूटा विद्यापीठाच्या संशोधनातून समोर आले आहे.  

टॅग्स :pollutionप्रदूषणIndiaभारतHealthआरोग्य