शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

गलवानवरून काँग्रेस-भाजपामध्ये धमासान, आता मायावतींना केले असे विधान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 16:54 IST

देशातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये सुरू असलेल्या या धमासानादरम्यान, आता बसपाप्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची गलवान वादावर प्रतिक्रिया समोर आली आहे.

ठळक मुद्देया संकटावर तोडगा काढण्यासाठी सरकार आणि विरोधी पक्षाने संपूर्ण परिपक्वता आणि एकजुटीने काम केले पाहिजेअशा कठीण आणि आव्हानात्मक प्रसंगी भारत सरकारच्या पुढील कारवाईबाबत लोकांच्या आणि तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे असू शकतातमात्र अशा प्रसंगी देशहीत आणि सीमेच्या रक्षणाची जबाबदारी सरकारवर सोडणेच योग्य ठरेल

नवी दिल्ली - लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्य दलांमध्ये निर्माण झालेला तणाव सध्या जैसे थे आहे. मात्र सीमेवरील तणावामुळे दिल्लीतील राजकीय वातावरणही सध्या तापलेले आहे. लडाखमधील चिनी घुसखोरीवरून आरोपांच्या फैरी झाडून काँग्रेसने सत्ताधारी मोदी सरकारला जेरीस आणले आहे. तर दुसरीकडे भाजपाकडून या आरोपांना प्रत्युत्तर देण्यात येत आहे. देशातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये सुरू असलेल्या या धमासानादरम्यान, आता बसपाप्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची गलवान वादावर प्रतिक्रिया समोर आली आहे.

गलवान विवादावर ट्विटरव दिलेल्या प्रतिक्रियेत मायावती म्हणाल्या की, ‘’हल्लीच १५ जून रोजी लडाखमध्ये चिनी सैन्यासोबत झालेल्या झटापटीत भारताच्या कर्नलसह एकूण २० जवानांना वीरमरण आले आहे, या घटनेमुळे संपूर्ण देश खूप दु:खी आणि चिंतीत आहे. या संकटावर तोडगा काढण्यासाठी सरकार आणि विरोधी पक्षाने संपूर्ण परिपक्वता आणि एकजुटीने काम केले पाहिजे, हे काम संपूर्ण जगाला दिसले पाहिजे आणि प्रभावी असले पाहिजे,’’

अशा कठीण आणि आव्हानात्मक प्रसंगी भारत सरकारच्या पुढील कारवाईबाबत लोकांच्या आणि तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे असू शकतात. मात्र अशा प्रसंगी देशहीत आणि सीमेच्या रक्षणाची जबाबदारी सरकारवर सोडणेच योग्य ठरेल. तसेच हे काम ही सरकारची जबाबदारीच आहे, असा मायावती यांनी सांगितले.  

एकीकडे गलवानवरून कांग्रेस केंद्र सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत असताना मायावती यांनी अशा आशयाचे विधान केल्याने हे विधान चर्चेचा विषय ठरले आहे. दरम्यान, आज सकाळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून सरकारवर टीका केली होती. त्यानंतर राहुल गांधींसह संपूर्ण काँग्रेस पक्ष सरकारविरोधात आक्रमक झाला आहे.  दरम्यान, मनमोहन सिंग यांनी केलेल्या आरोपांना भाजपाकडून प्रत्युत्तरही देण्यात आले आहे. नड्डा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मनमोहनसिंग यांच्या पत्राला उत्तर दिले आहे. त्यात ते म्हणतात की, निश्चितच ते काही विषयांसंदर्भात आम्हाला सल्ला व सूचना देऊ शकतात. मात्र, पंतप्रधान कार्यालयाची जबाबदारी त्यापैकी एक नाही. शिवाय ते त्याच पक्षाचे नेते आहेत, ज्या पक्षाने हजारो किमी जमीन चीनला देऊ केल्याचे म्हटले. नड्डा यांनी मनमोहन सिंग यांच्यावर निशाणा साधला. डॉक्टर मनमोहनसिग हे त्याच पक्षाचे आहेत, ज्या पक्षाने 43000 किमी जमी चीनला दिली आहे. कुठल्याही लढाईशिवाय रणनिती आणि क्षेत्रीय समर्पण युपीए सरकारच्या कार्यकाळात झाले आहे. डॉ. सिंग हे चीनी डिझाईनमुळे चिंतेत आहेत. सन 2010 ते 2013 या कालावधीत चीनकडून 600 पेक्षा अधिकवेळी सीमाभागात घुसखोरी करण्यात आली, त्यावेळी सिंग हेच अध्यक्ष होते, असेही नड्डा यांनी म्हटलंय.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन

टॅग्स :mayawatiमायावतीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीcongressकाँग्रेसBJPभाजपाladakhलडाखIndiaभारत