शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

"आणखी २० जागा जिंकल्या असत्या तर भाजपचे नेते तुरुंगात गेले असते..."; खरगेंच्या विधानावर भाजपचे प्रत्युत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 11:07 IST

Jammu Kashmir Assembly Election 2024 : या प्रचारादरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. 

Jammu Kashmir Assembly Election 2024 : जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी आपापली तयारी केली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून जोरदार प्रचार सुरु आहे. या प्रचारादरम्यान बुधवारी (दि.११) काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. 

लोकसभा निवडणुकीत आणखी २० जागा जिंकल्या असत्या तर भाजपचे अनेक नेते आतापर्यंत तुरुंगात गेले असते, असे मल्लिकार्जुन खरगे अनंतनागमधील प्रचारसभेत म्हणाले. दरम्यान, मल्लिकार्जुन खरगे यांच्या या विधानावर भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मल्लिकार्जुन खरगे यांचे हे विधान काँग्रेसच्या आणीबाणीच्या मानसिकतेचे उत्तम उदाहरण असल्याचे भाजपने म्हटले आहे.

काय म्हणाले मल्लिकार्जुन खरगे?भाजपचे लोक ४०० पार, ४०० पार म्हणायचे. तुमचा ४०० पार कुठे गेला? त्यांना केवळ २४० जागा मिळाल्या. आम्ही आणखी २० जागा जिंकल्या असत्या तर ते तुरुंगात गेले असते. ते तुरुंगात राहण्यास पात्र आहेत, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले होते. दरम्याान, 'अबकी बार ४०० पार' ही भाजपची लोकसभा निवडणुकीत घोषणा होती. लोकसभा निवडणुकीत भाजपला २४० जागा मिळाल्या, तर काँग्रेससह इंडिया आघाडीला २३४ जागा मिळाल्या होत्या.

भाजपचे जोरदार प्रत्युत्तर मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानावर भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला म्हणाले की, हे काँग्रेसच्या आणीबाणीच्या मानसिकतेचे स्पष्ट उदाहरण आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादून विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले होते. तसेच, काँग्रेसला तो वारसा पुढे चालवायचा आहे, असे म्हणत शेहजाद पूनावाला यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. दरम्यान, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू केली होती, ती २१ महिने होती.

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसBJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीर