शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

"आणखी २० जागा जिंकल्या असत्या तर भाजपचे नेते तुरुंगात गेले असते..."; खरगेंच्या विधानावर भाजपचे प्रत्युत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 11:07 IST

Jammu Kashmir Assembly Election 2024 : या प्रचारादरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. 

Jammu Kashmir Assembly Election 2024 : जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी आपापली तयारी केली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून जोरदार प्रचार सुरु आहे. या प्रचारादरम्यान बुधवारी (दि.११) काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. 

लोकसभा निवडणुकीत आणखी २० जागा जिंकल्या असत्या तर भाजपचे अनेक नेते आतापर्यंत तुरुंगात गेले असते, असे मल्लिकार्जुन खरगे अनंतनागमधील प्रचारसभेत म्हणाले. दरम्यान, मल्लिकार्जुन खरगे यांच्या या विधानावर भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मल्लिकार्जुन खरगे यांचे हे विधान काँग्रेसच्या आणीबाणीच्या मानसिकतेचे उत्तम उदाहरण असल्याचे भाजपने म्हटले आहे.

काय म्हणाले मल्लिकार्जुन खरगे?भाजपचे लोक ४०० पार, ४०० पार म्हणायचे. तुमचा ४०० पार कुठे गेला? त्यांना केवळ २४० जागा मिळाल्या. आम्ही आणखी २० जागा जिंकल्या असत्या तर ते तुरुंगात गेले असते. ते तुरुंगात राहण्यास पात्र आहेत, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले होते. दरम्याान, 'अबकी बार ४०० पार' ही भाजपची लोकसभा निवडणुकीत घोषणा होती. लोकसभा निवडणुकीत भाजपला २४० जागा मिळाल्या, तर काँग्रेससह इंडिया आघाडीला २३४ जागा मिळाल्या होत्या.

भाजपचे जोरदार प्रत्युत्तर मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानावर भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला म्हणाले की, हे काँग्रेसच्या आणीबाणीच्या मानसिकतेचे स्पष्ट उदाहरण आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादून विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले होते. तसेच, काँग्रेसला तो वारसा पुढे चालवायचा आहे, असे म्हणत शेहजाद पूनावाला यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. दरम्यान, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू केली होती, ती २१ महिने होती.

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसBJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीर