शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
3
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
4
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
5
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
6
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
7
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
8
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
9
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
10
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
11
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
12
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
13
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
14
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
15
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
16
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
17
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
18
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

भाजपला काँग्रेसची इतकी भीती वाटण्याचे कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 6:32 AM

काँग्रेस सत्तेत नाही, पक्षाकडे पैसा नाही; तरीही भाजपने काँग्रेसमधल्या बेकार आणि कलंकित नेत्यांना आपल्या तंबूत घेण्यासाठी धडपड चालवली आहे. ही बेचैनी कसली?

अभिलाष खांडेकर, रोविंग एडिटर, लोकमत समूह

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आपल्या इतिहासात आज आहे इतकी कमजोर, दिशाहीन, निर्धन, नेतृत्वहीन कधीही नव्हती. दिल्लीत काँग्रेस दहा वर्षांपासून सत्तेच्या बाहेर आहे. तर मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, हरयाणा किंवा उत्तर प्रदेशसारख्या राज्यांत काँग्रेस अस्तित्वासाठी झगडते आहे. १९४७ पासून सातत्याने देशावर राज्य करणारा हा पक्ष आता अनेक राज्यांत दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावरचा पक्ष झाला आहे. भ्रष्टाचार, अंतर्गत कलह, नेहरू-गांधी परिवारावर टोकाचे अवलंबित्व, नव्या गोष्टींना नकार ही पक्षाच्या पतनाची प्रमुख कारणे. भविष्य चिंताजनक आहे. कारण या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांची  खरीद-फ़रोख़्त  कधी नव्हती एवढी वाढली आहे. त्याचे श्रेय आक्रमक भाजपच्या रणनीतीचे! 

दहा वर्षांपूर्वी दिल्लीची सत्ता मिळाल्यानंतर लगेच सत्तारूढ पक्षाने भारत काँग्रेसमुक्त करण्याचा संकल्प सोडला. काँग्रेसने ही गोष्ट हसण्यावारी नेली; परंतु भाजप गांभीर्याने काम करत राहिला. २०१८ मध्ये छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये विजय मिळाल्यामुळे काँग्रेसला थोडा दिलासा मिळाला हे खरे; पण २०२३ मध्ये तिथेही पक्षाला पराभव पाहावा लागला. कर्नाटकात आणि अगदी अलीकडे तेलंगणात पक्षाला यश मिळाले. संसदेत या पक्षाचे खासदार इतके कमी झाले  की कट्टर समर्थकांनाही घोर निराशा यावी.

- असे असूनही भाजप मात्र सतत काँग्रेसबद्दल काळजी करताना दिसतो. मधल्या काळात काँग्रेसला पक्ष संघटना मजबूत करता आली नाही. त्यामुळे पक्ष आणखीन खोल संकटात गेला. दुसरीकडे भाजप सतत प्रयोग करत राहून नवीन नेते तयार तयार करत गेला. काँग्रेसला भाजपची नक्कलही करता आली नाही. ८२ वर्षांच्या मल्लिकार्जुन खरगे यांना अध्यक्ष करणे किंवा इच्छा नसताना दिग्विजय सिंह यांना ७७ व्या वर्षी लोकसभेच्या निवडणुकीत उतरवणे हे पक्षाच्या कमजोरीचे दाखलेच! अंतर्गत कलह आणि शिस्तीचा अभाव हे शाप काँग्रेसच्या नशिबी आहेतच. असे असूनही  राजकीय निरीक्षकांना या गोष्टीचे आश्चर्य वाटते आहे की, आपला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसबद्दल भाजपला चिंता किंवा भीती वाटते आहे. 

भाजपला तिसऱ्यांदा सत्तेवर यायचे आहे. ‘इंडिया आघाडी’ मैदानात असूनही भाजपचे काम तसे सोपे आहे, असे बहुतेक निवडणूक विश्लेषकांना वाटते. आश्वासन दिल्याप्रमाणे राम मंदिराची निर्मिती झाली, कलम ३७० हटवले गेले, यातून हिंदू मतांची एकजूट झाली. चार महिन्यांपूर्वीच भाजपने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये मोदींच्या गॅरंटीची मधुर फळे चाखली आहेत. पायाभूत सुविधांचा विकास होताना दिसतो आहे. ‘जी २०’च्या यशानंतर परराष्ट्र नीती वैश्विक शक्तीना मंत्रमुग्ध करीत आहे. चलनवाढीचा मुद्दा मध्यमवर्ग मांडताना दिसत नाही. योगी आणि यादव, विष्णू साई आणि शिंदे आपापल्या राज्यात चांगले काम करत आहेत. नितीश यांना मोहित करून ‘एनडीए’त पुन्हा आणले गेले आहे. मोठी व्यापारी घराणी भाजपच्या बरोबर आहेत. तर मग प्रश्न कुठे राहतो?

गेल्या पाच वर्षांतील प्रभावशाली सुशासनामुळे मोदींचे पारडे जड आहे; तरीही भाजप नेते जाता-येता काँग्रेसला कोसत आहेत. हल्ले करत आहेत. काँग्रेसला मुस्लिम समर्थक म्हणत हा पक्ष भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देतो असे सातत्याने देशाला सांगितले जाते आहे. काँग्रेस सत्तेत नाही आणि पैसा कमावण्यासाठीही सक्षम नाही हे भाजपला उत्तम प्रकारे माहीत होते. तरीही भाजपने काँग्रेसला तोडून त्या पक्षातल्या बेकार आणि कलंकित नेत्यांना आपल्या तंबूत येण्यासाठी राज्या-राज्यात आपल्या लोकांना कामाला लावले. ही बेचैनी कसली, कशामुळे आहे? जगातील सर्वांत मोठ्या पक्षाच्या टोलेजंग नेत्यांनी मरणपंथाला लागलेल्या एका पक्षावर आपली ताकद खर्च करण्यापेक्षा विकसित भारताविषयी बोलले पाहिजे, नाही का?

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस