शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

…तर ते कागद दाखवावे लागतील?, नव्या ‘वक्फ’ कायद्यावरील सुनावणीत ती मेख, केंद्र होणार खूश   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 20:42 IST

Waqf Board Amendment law: वक्फ संशोधन कायद्यावर आज झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयांनी वक्फ बाय युझर आणि रजिस्टर्स वक्फ मालमत्तांना हात न लावण्याची सूचना केंद्र सरकारला दिली आहे. मात्र ज्या मालमत्तांची कुठलीही नोंद नाही, कुठलीही कागदपत्रे नाहीत, अशा मालमत्तांचं या आदेशान्वये काय होईल? सरकार त्यावर काही कारवाई करू शकणार का? अशा जमिनींचे कागद दाखवण्यास सांगता येईल का? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

वक्फ संशोधन कायद्यावर आज झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयांनी वक्फ बाय युझर आणि रजिस्टर्स वक्फ मालमत्तांना हात न लावण्याची सूचना केंद्र सरकारला दिली आहे. मात्र ज्या मालमत्तांची कुठलीही नोंद नाही, कुठलीही कागदपत्रे नाहीत, अशा मालमत्तांचं या आदेशान्वये काय होईल? सरकार त्यावर काही कारवाई करू शकणार का? अशा जमिनींचे कागद दाखवण्यास सांगता येईल का? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. याबाबच सर्वोच्च न्यायालयातील एका वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार सरन्यायाधीशांनी आजच्या सुनावणीवेळी अशी रेघ ओढली आहे ज्यामुळे केंद्र सरकार नक्कीच खूश होणार आहे. कारण कुठलीली नोंद नसलेल्या मालमत्तांवर कारवाई करण्यापासून सरकारला सर्वोच्च न्यायालयाने रोखलेलं नाही.

आजच्या सुनावणीवेळी कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी वारंवार वारंवार ही बाब सरन्यायाधीशांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत होते. एका अंदाजानुसार वक्फ बोर्डाकडे देशभरात कुठलीही नोंद नसलेल्या तब्बल ४ लाख ३६ हजार, १६९ मालमत्ता आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीला याचिकाकर्त्यांच्यावतीने हजर झालेले अॅडव्होकेट वरुण कुमार सिन्हा यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने कायद्याला स्थगिती दिलेली नाही. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आम्ही सात दिवसांमध्ये आपलं उत्तर कोर्टात सादर करू, तसेच नव्या कायद्यानुसार वक्फ बोर्डामध्ये कुठलीही नियुक्ती केली जाणार नाही, तोपर्यंत तुम्ही कुठलाही आदेश देऊ नका, असे सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.

सरकार पुढच्या तारखेपर्यंत ज्या वक्फ मालमत्ता नोंदणी झालेल्या आणि गॅझेटेड आहेत, त्यांना डी-नोटिफाय करणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आजच्या आदेशात लिहिले आहे. मात्र इतर वक्फ मालमत्तांवर  कारवाई  करण्याचे स्वातंत्र्य सरकारला असेल. त्यामुळे ज्या वक्फ मालमत्ता नोंदणीकृत नाही आहेत, तसेच वक्फ बाय युझर आहेत, त्यांच्याकडून कागदपत्रे मागितली जाऊ शकतात. मात्र याबाबतची अधिक स्पष्टता ही पुढील सुनावणीनंतरच येणार आहे.

दरम्यान, पुढील सुनावणीपर्यंत वक्फ बाय डीड आणि वक्फ बाय युझरला डी-नोटिफाय म्हणजेच गैरअधिसूचिक केलं जाणार नाही, असं आश्वासन केंद्र सरकारने वक्फ बोर्डाला दिलं आहे.  

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार