शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वाघूरने केली सत्तरी पार... मेहरूण तलाव ओव्हर फ्लोच्या मार्गावर : जळगावकरांसाठी भक्कम पाणी साठा, शेतीलाही पाणीच पाणी

By admin | Updated: September 26, 2016 00:35 IST

जळगाव : परतीचा पाऊस जळगावकरांसाठी सुखद ठरत असून शहरास पाणी पुरवठा होत असलेल्या वाघूर धरणात पाणी साठा गेल्या दोन दिवसांपासून सातत्त्याने वाढतो आहे. या धरणाने आता सत्तरी पार केल्याने जवळपास तीन वर्षांचा पाणी साठा आता उपलब्ध होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. धरणात आता जवळपास ७२ टक्के पाणी साठा झाला आहे.

जळगाव : परतीचा पाऊस जळगावकरांसाठी सुखद ठरत असून शहरास पाणी पुरवठा होत असलेल्या वाघूर धरणात पाणी साठा गेल्या दोन दिवसांपासून सातत्त्याने वाढतो आहे. या धरणाने आता सत्तरी पार केल्याने जवळपास तीन वर्षांचा पाणी साठा आता उपलब्ध होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. धरणात आता जवळपास ७२ टक्के पाणी साठा झाला आहे.
जिल्‘ात यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस आहे. अपवाद होता तो जामनेर तालुक्याचा या तालुक्यात तसेच वाघूर नदीच्या उगमस्थळी समाधानकारक पाऊस नसल्याने वाघूरच्या मागील वर्षीच्या पाणी साठ्यात फारशी वाढ अशी नव्हतीच. गेल्या आठवड्यात या धरणाच्या उपयुक्त पाणी साठ्याची टक्केवारी ६१ टक्के होती. ६१ ठक्के साठा म्हणजे शहराच्या पाणी पुरवठ्याची दोन वर्षांची चिंता मिटली अशी परिस्थिती होती.
परतीच्या पावसाची कृपा
जळगाव शहर व तालुक्यात समाधानकारक पाऊस आहे. वाघूर प्रकल्प क्षेत्र तसेच जामनेर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत ६० ते ६५ टक्के पाऊस झाला होता. एकीकडे जिल्‘ातील बहुतांश तालुक्यात सरासरी पाऊस पडत असताना जामनेर तालुक्यात असे चित्र होते. परतीच्या पावसाने मात्र वाघूरच्या पाणलोट क्षेत्रावर कृपा केल्याचीच परस्थिती आहे.
पाणी साठ्यात झपाट्याने वाढ
जुलै महिन्यात वाघूर प्रकल्पात ५० टक्के पाणी साठा होता. तोनंतर हळू हळू वाढत जाऊन गेल्या आठवड्यात ६१ टक्क्यांवर आला. जामनेर तालुका तसेच वाघूर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जवळपास संपूर्ण पावसाळ्यात फारसा पाऊस नसल्याने ६१ च्या जवळपासच साठा थांबेल असे चित्र असताना दोन दिवसातील परतीच्या पावसाने वाघूर व उपनद्यांना पुर आला असून त्याचे परिणाम वाघूर धरणाच्या पाणी साठ्यावर होत असल्याचे लक्षात येत आहे.
-----
अशी होती तीन वर्षातील स्थिती
गेल्या वर्षी धरणाच्या लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस नव्हता. २०१३, २०१४ मध्ये धरणाच्या लाभ क्षेत्रात अतिशय चांगला पाऊस झाल्याने वाघूर धरण १०० टक्के भरले होते. परिणामी परिसरातील पिण्याच्या व शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले होते. जिल्हयातील अतिशय महत्वाकांक्षी असा हा प्रकल्प आहे. मोठ्या प्रकल्पांमध्ये मोडणार्‍या या प्रकल्पावरून जळगाव, जामनेर व भुसावळ तालुक्यातील काही गावांना सिंचनासाठी वाघूरच्या पाण्याचा उपयोग होत असतो. २०१५ मध्ये पावसाचे प्रमाण अतिशय नगण्य होते मात्र शिल्लक साठ्यामुळे पाण्याची अडचणी निर्माण होऊ शकली नाही. २०१२ मध्ये कमी पावसामुळे धरणात शुन्य टक्के साठा झाला होता.
-----
साठा पोहोचला ७२ टक्क्यांवर
अजिंठ्या नजीक लेण्यांच्या परिसरातील पर्वत रांगांमधून वाघूर नदीचे उगमस्थान आहे. या परिसरात चांगला पाऊस सुरू असून पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणात रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ७२ टक्के पाणी साठा झाला आहे. या साठ्यामुळे जळगाव शहरास तीन वर्षे पुरेल एवढा पाणी साठा धरणात उपलब्ध असून जवळपास २५ हजार हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. याचा फायदा रब्बीचे क्षेत्रही यंदा वाढणार असल्याचे चित्र वाघूरच्या पाणी साठ्यामुळे निर्माण झाले आहे