शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
2
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
3
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
4
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
5
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
6
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
7
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
8
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
9
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
10
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
11
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
12
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
13
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
14
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
15
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
16
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
17
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
18
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
19
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
20
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ

रियल हिरो! केरळमधील वीज कर्मचाऱ्यांचा फोटो व्हायरल, नेटीझन्सचा 'सॅल्यूट' 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 1:57 PM

Kerala Floods : केरळमध्ये पावसाच्या पाण्यात ताज्या माहितीनुसार 167 जणांचा जीव गेला असून मदत आणि बचावकार्य वेगात सुरू आहे. देशभरातून केरळमधील जनतेसाठी प्रार्थना करण्यात येत आहे. वरुणराजाला थांबण्यासाठी साकडे घालण्यात येत आहे. हे सर्व होत असतानाच

तिरुवअनंतपुरम - केरळमध्ये पावसामुळे हाहाकार माजला आहे. नेहमीच्या पावसापेक्षा साधारणत: 250 टक्के जास्तीचा पाऊस झाल्याचे सांगण्यात येत असून येथील नद्यांना महापूर आला आहे. ताज्या माहितीनुसार 167 जणांचा जीव गेला असून मदत आणि बचावकार्य वेगात सुरू आहे. देशभरातून केरळमधील जनतेसाठी प्रार्थना करण्यात येत आहेत. वरुणराजाला थांबण्यासाठी साकडे घालण्यात येत आहे. हे सर्व होत असताना, केरळच्या वीज वितरण विभागातील कर्चचाऱ्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुसधार कोसळणाऱ्या पावसात कर्तव्य बजावणाऱ्या या जिगरबाज कर्मचाऱ्यांना नेटीझन्सकडून सॅल्यूट ठोकण्यात येत आहे. 

केरळमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. जोरदार पावसानं आलेल्या पुरात आतापर्यंत 8 हजार कोटींचं नुकसान झालं आहे. हवामान खात्यानं राज्यातील 14 पैकी 13 जिल्ह्यांत पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच सेंट्रल वॉटर कमिशनही पुराचं पाणी तुंबणाऱ्या भागावर नजर ठेवून आहे. मुसळधार पावसानं आतापर्यंत 167 जणांचा बळी घेतला आहे. एनडीआरएफच्या पाच टीम तिरुअनंतपुरममध्ये दाखल झाल्या आहेत. सध्या एनडीआरएफच्या टीमकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. तसेच एनडीआरएफची आणखी जवान केरळमध्ये दाखल होणार आहेत.

अबब! केरळमधल्या पुरात आतापर्यंत 167 जणांचा मृत्यू, 8 हजार कोटींहून अधिकचं नुकसान

पावसानंतर महापूर आल्याने अनेक ठिकाणी विजेच्या समस्या निर्माण झाल्या असून वीज वितरण विभागाकडून काही ठिकाणी वीजपुरवठा खंडीत करण्यासाठी तर अनेक ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी जीवाची बाजी लावण्यात येत आहे. केरळमधील वीज वितरण विभागातील कर्मचाऱ्यांचा असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मुसळधार पावसात कर्तव्य बजावताना दिसत आहेत. इलेक्टीक विभागातील चार कर्मचारी डोक्यावर सुरक्षा टोपी आणि अंगावर रेनकोट घालून धो-धो कोसळणाऱ्या पावसात ड्युटी बजावत आहेत. स्वत:ला दोरखंडाशी बांधून घेत वीजेचा प्रवाह सुरू करण्याचा अन् राज्यातील नागरिकांच्या मदतीसाठी जीवाची बाजी लावताना दिसत आहेत. सध्या, सोशल मीडियावर या कर्मचाऱ्यांचा फोटो व्हायरल होत आहे. नेटीझन्सकडून या कर्मचाऱ्यांना जवांनाची उपमा देण्यात येत आहे. सीमेवर जवान लढत आहेत, तर केरळातही वीज कर्मचारी जवानांप्रमाणेच काम करत आहेत, असा संदेशही लिहिण्यात येत आहे. तसेच या कर्मचाऱ्यांना नेटीझन्सकडून सॅल्यूटही करण्यात येत आहे. दरम्यान, केरळमधील पूरस्थिती गंभीर बनली असून मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी देशाला मदतीचे आवाहन केले आहे.    

दरम्यान, कुन्नूर, वायनाड, कोझिकोड, मलप्पुरम आणि इडुक्की जिल्ह्यांत भूस्खलनाच्या घटना समोर आल्या आहेत. याच दरम्यान गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने मल्लपेरियार धरणाची देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांना सूचना केली होती की, धरणाचे दरवाजे उघडण्याआधी सभोवतालच्या परिस्थितीचा आढावा घ्या आणि मगच पाणी सोडा. तसेच मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्यायाधीश इंदू मल्होत्रा यांनी परिस्थितीवर सामंजस्याने तोडगा काढण्याचे सरकारला सांगितले आहे.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरKeralaकेरळelectricityवीजRainपाऊस