शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

१०५ वर्षांच्या वृद्धानं मरणाच्या ठिक ३० मिनिटं आधी पूर्ण केली आपली शेवटची इच्छा, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 11:53 AM

झारखंडमधील हजारीबाग पंचायतीच्या बेलाही येथील परतापूर गावात राहणारे वरुण साहू (105) यांनी शेवटच्या क्षणी मतदान करून जगाचा निरोप घेतला.

चौपारण, हजारीबाग-

झारखंडमधील हजारीबाग पंचायतीच्या बेलाही येथील परतापूर गावात राहणारे वरुण साहू (105) यांनी शेवटच्या क्षणी मतदान करून जगाचा निरोप घेतला. वरुण साहू यांचे त्यांच्या आयुष्यातील शेवटची इच्छा म्हणजेच मतदानाच्या अर्ध्या तासानंतर घरीच निधन झाले. एक जबाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापूर्वी वरुण साहू यांनी पंचायत निवडणुकीत मतदान केले. त्यानंतर त्यांनी घरी येऊन अखेरचा श्वास घेतला. मतदान करण्याची आपली शेवटची इच्छा असल्याचे त्यांनी कुटुंबीयांना आधीच सांगितले होतं, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते गजाधर प्रसाद यांनी दिली. 

105 वर्षीय वरुण साहू यांनी बेलाही पंचायतीच्या बूथ क्रमांक 256 वर मतदान केलं त्यानंतर घरी परतल्यावर दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूपूर्वी ते म्हणाले की, ''मी भाग्यवान आहे की या वयातही मी लोकशाहीत माझा सहभाग सुनिश्चित करू शकलो". आयुष्याच्या शेवटच्या क्षणी वरुण साहू यांनी मतदान करून लोकांमध्ये एक आदर्श निर्माण करण्याचं काम केलं आहे. वरुण यांच्या पश्चात दोन मुलांसह संपूर्ण कुटुंब आहे. त्यांच्या दोन्ही मुलांचा मुंबईत भाजीचा व्यवसाय आहे. वरुण साहू यांनी त्यांच्या घरी सांगितलं होतं की, माझी शेवटची इच्छा आहे की मला मतदानासाठी जाता यावं. यानंतर कुटुंबीयांनी त्यांच्या आग्रहापुढे नमतं घेत त्यांना गाडीवर बसवून मतदान करण्यासाठी नेलं होतं.  

वरुण साहू बराच काळ आजारी होते, पण तरीही त्यांची शेवटची इच्छा पूर्ण झाल्यावरच त्यांनी प्राण सोडले. यावरुनच लोकशाहीबद्दलची त्यांची जिद्द आणि परिभाषा लक्षात येते. शनिवारी सकाळपासूनच वरुण यांनी मतदानाला जाण्याचा हट्ट धरला होता. यावेळी त्यांच्यासोबत दोन्ही मुलंही होती. अखेर त्यांचा आग्रह पाहून वरुण यांना दुपारी २.४५ वाजता मतदान केंद्रावर नेण्यात आलं. यावेळी त्यांनी कारमध्ये बसून मतदान केलं. यानंतर ते घरी परतले आणि अर्ध्या तासात त्यांनी जगाचा निरोप घेतला.

टॅग्स :VotingमतदानJharkhandझारखंड