शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

Nitin Gadkari On Joshimath Sinking: “चारधाम मार्ग हा जोशीमठातील भूस्खलनाचे कारण नाही”; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 09:30 IST

Nitin Gadkari On Joshimath Sinking: जोशीमठ येथील परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत चालली असून, नितीन गडकरींनी यावर स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे.

Joshimath Sinking: उत्तराखंडातील जोशीमठ येथे भयावह परिस्थिती आहे. ठिकठिकाणी जमिनीला मोठ्या भेगा पडल्या आहेत. शेकडो घरांना तडे गेले आहेत. अनेकांना स्थलांतरित करण्यात येत आहे. जोशीमठमधील परिस्थितीची राज्य आणि केंद्र सरकारने दखल घेतली असून, उच्च स्तरीय बैठकांचे सत्र सुरू आहे. जोशीमठ येथील परिस्थितीला तेथील काही मोठे प्रकल्प कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी चारधाम यात्रेच्या मार्गामुळे जोशीमठ येथे भूस्खलन होत नाही, असे स्पष्ट केले आहे. 

एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, जोशीमठमध्ये दरड कोसळण्याच्या घटनांच्या कारणांचा तज्ज्ञ अभ्यास करत आहेत. जोशीमठ पर्वतामुळे समस्याग्रस्त आहे. चारधाम मार्गामुळे ही परिस्थिती उद्भवलेली नाही, असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. तसेच पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून 'ग्रीन फ्युल'साठी काम करत आहेत, मग ते हायड्रोजन असो, इथेनॉल असो किंवा इलेक्ट्रिक वाहने असोत. भारत लवकरच ऊर्जा निर्यात करणारा देश बनेल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी ग्रीन फ्युलबाबत बोलताना व्यक्त केला. 

येत्या पाच वर्षांत भारत सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक देश बनेल

भारत हा साखर, मका, तांदूळ आणि गहू यांचे अतिरिक्त उत्पादन असलेला देश आहे. ऊर्जा आणि वीज क्षेत्रात विविधता आली आहे. येत्या पाच वर्षांत भारत इथेनॉलचा सर्वात मोठा उत्पादक देश बनेल. ग्रीन हायड्रोजन हे भविष्य आहे. इथेनॉल आणि पेट्रोलचे मायलेज समान आहे. आता अधिकाधिक वाहन उत्पादक फ्लेक्स इंजिन वापरत आहेत, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. तसेच नितीन गडकरी यांनी नवीन महामार्गांची माहिती दिली. नवीन महामार्गामुळे ट्रकचालकांचा प्रवासाचा वेळ कमी होईल. यामुळे लॉजिस्टिक खर्चांत बचत होऊन निर्यातीत सुधारणा होईल, असे नितीन गडकरी म्हणाले. 

दरम्यान, याच कार्यक्रमात बोलताना, वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी मोदी सरकारच्या योजनांची माहिती दिली. मोदी सरकारचे ध्येय अर्थव्यवस्थेत आर्थिक समावेशन करणे आणि औपचारिक करणे आहे. जेव्हा अर्थ राज्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ गोष्टी सांगितल्या. तुम्हाला आर्थिक समावेशन, आर्थिक साक्षरता आणि डिजिटल व्यवहारांवर काम करावे लागेल, असे भागवत कराड यांनी नमूद केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीUttarakhandउत्तराखंड