शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

Nitin Gadkari On Joshimath Sinking: “चारधाम मार्ग हा जोशीमठातील भूस्खलनाचे कारण नाही”; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 09:30 IST

Nitin Gadkari On Joshimath Sinking: जोशीमठ येथील परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत चालली असून, नितीन गडकरींनी यावर स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे.

Joshimath Sinking: उत्तराखंडातील जोशीमठ येथे भयावह परिस्थिती आहे. ठिकठिकाणी जमिनीला मोठ्या भेगा पडल्या आहेत. शेकडो घरांना तडे गेले आहेत. अनेकांना स्थलांतरित करण्यात येत आहे. जोशीमठमधील परिस्थितीची राज्य आणि केंद्र सरकारने दखल घेतली असून, उच्च स्तरीय बैठकांचे सत्र सुरू आहे. जोशीमठ येथील परिस्थितीला तेथील काही मोठे प्रकल्प कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी चारधाम यात्रेच्या मार्गामुळे जोशीमठ येथे भूस्खलन होत नाही, असे स्पष्ट केले आहे. 

एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, जोशीमठमध्ये दरड कोसळण्याच्या घटनांच्या कारणांचा तज्ज्ञ अभ्यास करत आहेत. जोशीमठ पर्वतामुळे समस्याग्रस्त आहे. चारधाम मार्गामुळे ही परिस्थिती उद्भवलेली नाही, असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. तसेच पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून 'ग्रीन फ्युल'साठी काम करत आहेत, मग ते हायड्रोजन असो, इथेनॉल असो किंवा इलेक्ट्रिक वाहने असोत. भारत लवकरच ऊर्जा निर्यात करणारा देश बनेल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी ग्रीन फ्युलबाबत बोलताना व्यक्त केला. 

येत्या पाच वर्षांत भारत सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक देश बनेल

भारत हा साखर, मका, तांदूळ आणि गहू यांचे अतिरिक्त उत्पादन असलेला देश आहे. ऊर्जा आणि वीज क्षेत्रात विविधता आली आहे. येत्या पाच वर्षांत भारत इथेनॉलचा सर्वात मोठा उत्पादक देश बनेल. ग्रीन हायड्रोजन हे भविष्य आहे. इथेनॉल आणि पेट्रोलचे मायलेज समान आहे. आता अधिकाधिक वाहन उत्पादक फ्लेक्स इंजिन वापरत आहेत, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. तसेच नितीन गडकरी यांनी नवीन महामार्गांची माहिती दिली. नवीन महामार्गामुळे ट्रकचालकांचा प्रवासाचा वेळ कमी होईल. यामुळे लॉजिस्टिक खर्चांत बचत होऊन निर्यातीत सुधारणा होईल, असे नितीन गडकरी म्हणाले. 

दरम्यान, याच कार्यक्रमात बोलताना, वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी मोदी सरकारच्या योजनांची माहिती दिली. मोदी सरकारचे ध्येय अर्थव्यवस्थेत आर्थिक समावेशन करणे आणि औपचारिक करणे आहे. जेव्हा अर्थ राज्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ गोष्टी सांगितल्या. तुम्हाला आर्थिक समावेशन, आर्थिक साक्षरता आणि डिजिटल व्यवहारांवर काम करावे लागेल, असे भागवत कराड यांनी नमूद केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीUttarakhandउत्तराखंड