शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Nitin Gadkari On Joshimath Sinking: “चारधाम मार्ग हा जोशीमठातील भूस्खलनाचे कारण नाही”; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 09:30 IST

Nitin Gadkari On Joshimath Sinking: जोशीमठ येथील परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत चालली असून, नितीन गडकरींनी यावर स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे.

Joshimath Sinking: उत्तराखंडातील जोशीमठ येथे भयावह परिस्थिती आहे. ठिकठिकाणी जमिनीला मोठ्या भेगा पडल्या आहेत. शेकडो घरांना तडे गेले आहेत. अनेकांना स्थलांतरित करण्यात येत आहे. जोशीमठमधील परिस्थितीची राज्य आणि केंद्र सरकारने दखल घेतली असून, उच्च स्तरीय बैठकांचे सत्र सुरू आहे. जोशीमठ येथील परिस्थितीला तेथील काही मोठे प्रकल्प कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी चारधाम यात्रेच्या मार्गामुळे जोशीमठ येथे भूस्खलन होत नाही, असे स्पष्ट केले आहे. 

एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, जोशीमठमध्ये दरड कोसळण्याच्या घटनांच्या कारणांचा तज्ज्ञ अभ्यास करत आहेत. जोशीमठ पर्वतामुळे समस्याग्रस्त आहे. चारधाम मार्गामुळे ही परिस्थिती उद्भवलेली नाही, असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. तसेच पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून 'ग्रीन फ्युल'साठी काम करत आहेत, मग ते हायड्रोजन असो, इथेनॉल असो किंवा इलेक्ट्रिक वाहने असोत. भारत लवकरच ऊर्जा निर्यात करणारा देश बनेल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी ग्रीन फ्युलबाबत बोलताना व्यक्त केला. 

येत्या पाच वर्षांत भारत सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक देश बनेल

भारत हा साखर, मका, तांदूळ आणि गहू यांचे अतिरिक्त उत्पादन असलेला देश आहे. ऊर्जा आणि वीज क्षेत्रात विविधता आली आहे. येत्या पाच वर्षांत भारत इथेनॉलचा सर्वात मोठा उत्पादक देश बनेल. ग्रीन हायड्रोजन हे भविष्य आहे. इथेनॉल आणि पेट्रोलचे मायलेज समान आहे. आता अधिकाधिक वाहन उत्पादक फ्लेक्स इंजिन वापरत आहेत, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. तसेच नितीन गडकरी यांनी नवीन महामार्गांची माहिती दिली. नवीन महामार्गामुळे ट्रकचालकांचा प्रवासाचा वेळ कमी होईल. यामुळे लॉजिस्टिक खर्चांत बचत होऊन निर्यातीत सुधारणा होईल, असे नितीन गडकरी म्हणाले. 

दरम्यान, याच कार्यक्रमात बोलताना, वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी मोदी सरकारच्या योजनांची माहिती दिली. मोदी सरकारचे ध्येय अर्थव्यवस्थेत आर्थिक समावेशन करणे आणि औपचारिक करणे आहे. जेव्हा अर्थ राज्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ गोष्टी सांगितल्या. तुम्हाला आर्थिक समावेशन, आर्थिक साक्षरता आणि डिजिटल व्यवहारांवर काम करावे लागेल, असे भागवत कराड यांनी नमूद केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीUttarakhandउत्तराखंड