केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (रविवार) सलग नवव्यांदा देशाचा पूर्णकालिक अर्थसंकल्प सादर करत एक नवा इतिहास रचला. या अर्थसंकल्पावर विविध स्थरांतून प्रतिक्रिया येत आहेत. यातच, "हा अर्थसंकल्प 'सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेला आहे. विशेष म्हणजे, या अर्थसंकल्पात तरुण, महिला आणि शेतकरी या तीन घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे." असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.
प्रत्येक गाव आणि शहरातील तरुण, महिला आणि शेतकऱ्यांच्या स्वप्नांना शक्ती देणारा अर्थसंकल्प -निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर, अमित शाह यांनी 'एक्स'वर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "या अर्थसंकल्पात मॅन्युफॅक्चरिंगपासून इन्फ्रास्ट्रक्चरपर्यंत आणि आरोग्यापासून पर्यटनापर्यंत, ग्रामिण भागापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) पर्यंत आणि खेळांपासून ते धार्मिक स्थळांपर्यंत, हा अर्थसंकल्प प्रत्येक गाव आणि प्रत्येक शहरातील तरुण, महिला आणि शेतकऱ्यांच्या स्वप्नांना शक्ती देऊन ते पूर्ण करणारा आहे."
पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांचे मानले आभार -अमित शहा म्हणाले, हा अर्थसंकल्प भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याच्या उद्दिष्ट तयार करण्यात आला आहे. जो पुढील २५ वर्षांसाठी एक स्पष्ट रोडमॅप दर्शवतो. अमित शाह यांनी या ऐतिहासिक अर्थसंकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे अभिनंदन केले.
भारताल एका नव्या उंचीवर घेऊन जाणारा अर्थसंकल्प -दरम्यान, हा अर्थसंकल्प प्रत्येक भारतीयाच्या आशा-आकांक्षांना बळ देणारा, देशाच्या विकासाचा पाया अधिक मजबूत करणारा, देशातील प्रत्येक नागरिकाला सक्षम करणारा आणि जागतिक पटलावर भारताल एका नव्या उंचीवर घेऊन जाणारा ठरेल, असा विश्वासही अमित शाह यांनी यावेळी व्यक्त केला.
Web Summary : Amit Shah hails the Union Budget 2026 as inclusive, visionary, and focused on youth, women, and farmers. It aims to empower every village and city, fulfilling dreams and setting a roadmap for a developed India by 2047.
Web Summary : अमित शाह ने केंद्रीय बजट 2026 को समावेशी, दूरदर्शी और युवाओं, महिलाओं और किसानों पर केंद्रित बताया। इसका उद्देश्य हर गांव और शहर को सशक्त बनाना, सपनों को पूरा करना और 2047 तक विकसित भारत के लिए एक रोडमैप स्थापित करना है।