शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

मजीप्राच्या जलवाहिनीला गळती; रस्त्यावर पाण्याचे डबके

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

खानापूर: पातूर ते खानापूर मार्गावरील मुल्तारामनगरालगत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीवरील दोन व्हॉल्वमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असून, या पाण्याचे डबके रस्त्यावर साचले आहे. त्यामुळे मुल्तारामनगरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

खानापूर: पातूर ते खानापूर मार्गावरील मुल्तारामनगरालगत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीवरील दोन व्हॉल्वमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असून, या पाण्याचे डबके रस्त्यावर साचले आहे. त्यामुळे मुल्तारामनगरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
खानापूर मार्गावरील नाल्यापासून काही मीटर अंतरावर जैन यांच्या घरासमोर पातूर पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीवर असलेल्या दोन व्हॉल्वमधून पाण्याची गळती होत आहे. यामुळे रस्त्यावर घाण पाण्याचे डबके साचले आहे. याचा रस्त्यावरून जाणार्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याच्या डबक्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने परिसरातील लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. मुल्तारामनगरातील श्यामराव कवले, वैभव परमाळे, महेश वाडेकर आदींनी मजीप्राच्या पातूर येथील शाखा अभियंत्यांना १ डिसेंबर रोजी जलवाहिनीची गळती बंद करण्याबाबतचे निवेदन सादर केले होते; परंतु त्याची दखल घेतल्या गेली नाही. त्यानंतर १३ डिसेंबर रोजी या लोकांनी त्यांना पुन्हा एक स्मरणपत्र दिले. त्यानंतरही संबंधित विभागाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. दोन दिवसांपूर्वी या डबक्याच्या ठिकाणी माती टाकण्यात आली; परंतु पाण्यामुळे ही माती वाहून गेली. त्यामुळे संबंधित विभागाने पाण्याची गळती बंद करून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर) 21 सीटीसीएल