शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

तीन पोलिसांचे अपहरण करून अतिरेक्यांनी केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 6:40 AM

हिजबुल मुजाहिद्दिनच्या दहशतवाद्यांनी गुरुवारी काश्मीरमध्ये तीन पोलिसांना अपहरण करून ठार केल्याने खळबळ उडाली आहे.

श्रीनगर : हिजबुल मुजाहिद्दिनच्या दहशतवाद्यांनी गुरुवारी काश्मीरमध्ये तीन पोलिसांना अपहरण करून ठार केल्याने खळबळ उडाली आहे.शोपियां जिल्ह्यातील तीन विशेष पोलीस अधिकारी व एकाचा भाऊ यांचे गुरुवारी भरदिवसा घरात घुसून कुटुंबीयांसमोरच बंदुकीचा धाक दाखवत अपहरण करण्यात आले होते. त्यापैकी फिरदोस अहमद कुचे, कुलदीप सिंग व निसार अहमद धोबी या तिघा अधिकाऱ्यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. फय्याज अहमद भाट याची मात्र अतिरेक्यांनी सुटका केली आहे.हिजबुलचा कमांडर आणि मोस्ट वाँटेड अतिरेकी रियाझ नायकू याने या हत्येची जबाबदारी स्वीकारली. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची सुटका करण्यात यावी, अन्यथा हे प्रकार सुरूच राहतील, असे तो सांगत असल्याचा व्हिडीओच समोर आला. ‘राजीनामा द्या, अन्यथा तुम्हाला परिणाम भोगावे लागतील,’ अशा धमकी काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी या पोलीस कर्मचाºयांना दिल्या होत्या. गेल्या महिन्यात अतिरेक्यांनी पोलिसांच्या कुटुंबातील १0 जणांचे अपहरण केले होते. मात्र, त्यांची नंतर सुटका करण्यात आली. (वृत्तसंस्था)>पाकसोबतची बैठक भारताकडून रद्दतीन पोलिसांची दहशतवाद्यांनी अत्यंत क्रूर पद्धतीने केलेली हत्या, तसेच अतिरेकी बुºहान वणी याच्यावर पाकिस्तानने जारी केलेले टपाल तिकीट या गोष्टींतून त्या देशाचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांचा खरा चेहरा उघड झाला आहे, अशी टीका भारताने केली आहे, तसेच दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची न्यूयॉर्कमध्ये या महिन्यात होणारी बैठक भारताने रद्द केल्याचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी म्हटले आहे. अशी बैठक घेण्याची विनंती इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून केली होती. मात्र, ही बैठक रद्द करून भारताने आपल्या कणखर भूमिकेचा प्रत्यय पाकिस्तानला दिला.

टॅग्स :terroristदहशतवादीTerrorismदहशतवाद