शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नेहरुंच्या काळात कुंभमेळ्यात हजारो लोक मारले गेले- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 11:19 IST

कुंभमेळ्याच्या आयोजनावर भाष्य करत मोदींची नेहरुंवर टीका

कौशांबी (उप्र): पंडित जवाहरलाल नेहरुंनी कुंभमेळ्याला दिलेल्या भेदीदरम्यान हजारो लोक चेंगराचेंगरीत मारले गेले, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते कौशांबीत एका जाहीर सभेत बोलत होते. नेहरुंनी कुंभमेळ्याला भेट दिली. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत हजारो नागरिकांनी प्राण गमावला. मात्र सरकारची आणि नेहरुंची नाचक्की टाळण्यासाठी त्यावेळी हे वृत्त दाबण्यात आलं, असा दावा मोदींनी केला. यंदा कुंभमेळ्यात कोट्यवधी लोक आले. पंतप्रधान स्वत: आले. मात्र कोणतीही चेंगराचेंगरी झाली नाही. कोणाचाही मृत्यू झाला नाही. सरकार बदलल्यावर व्यवस्था कशी बदलते, याचं हे उदाहरण असल्याचं मोदी म्हणाले. 'नेहरु कुंभमेळ्याला भेट देण्यासाठी आले होते, त्यावेळी तर फारशी गर्दीदेखील नव्हती. केंद्र आणि राज्यात काँग्रेसचं सरकार होतं. मात्र तरीही चेंगराचेंगरीचं वृत्त दाबण्यात आलं. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना एक रुपयादेखील दिला गेला नाही. केवळ चेंगराचेंगरीच नव्हे, तर त्यानंतरदेखील जे घडलं ते अतिशय असंवेदनशील होतं. अन्यायकारक होतं,' असं मोदी म्हणाले. मी अनेकदा कुंभमेळ्याला भेट दिली आहे, असं मोदींनी सांगितलं. 'जेव्हा सरकार बदलतं, तेव्हा नियत बदलते आणि त्यानंतर परिणाम दिसू लागतात. प्रयागराजनं यंदा हे अनुभवलं. आधी या ठिकाणी कुंभमेळा व्हायचा, तेव्हा आखाड्यावरुन वाद व्हायचे. भ्रष्टाचार झाल्याची चर्चा व्हायची. मात्र यंदाच्या कुंभमेळ्यानं सर्वांची मान अभिमानानं उंचावली. एकही आरोप झाला नाही. ज्यांनी या मेळ्यात स्वच्छतेची जबाबदारी पार पाडली, त्यांच्याबद्दल तर माझ्या मनात अतिशय आदराची भावना आहे. त्यांनी कुंभमेळ्याबद्दल लोकांच्या मनात असलेली प्रतिमा बदलली,' असं मोदींनी म्हटलं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूKumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेश