शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 06:02 IST

यंदाच्या मान्सून हंगामात म्हणजेच जून ते सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, वीज कोसळणे आणि उष्णतेच्या लाटेमुळे देशभरात किमान १,५२८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

नवी दिल्ली : यंदाच्या मान्सून हंगामात म्हणजेच जून ते सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, वीज कोसळणे आणि उष्णतेच्या लाटेमुळे देशभरात किमान १,५२८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. या कालावधीत मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्र ही राज्ये सर्वाधिक प्रभावित ठरली.

आकडेवारीनुसार, अतिवृष्टीमुळे ९३५ जणांचे प्राण गेले, तर ५७० जणांचा मृत्यू वीज कोसळणे व मेघगर्जनेसारख्या घटनांमुळे झाला.

कुठे, किती पाऊस झाला?

१. देशभरात यंदा ९३७.२ मिमी पाऊस झाला, जो सरासरीपेक्षा ८ टक्के जास्त आहे. पूर्व व ईशान्य भारतात मात्र २० टक्के कमी पाऊस झाला. येथे केवळ १,०८९.९ मिमी पाऊस पडला, जो १९०१ नंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत कमी पाऊस आहे.

२. उत्तर-पश्चिम भारतात ७४७.९ मिमी पाऊस झाला, जो सरासरीपेक्षा २७.३ टक्के जास्त आहे. पंजाबमध्ये दशकांतील सर्वांत मोठा पूर आला.

राज्यनिहाय परिस्थिती

> मध्य प्रदेशात २९० मृत्यू नोंदले गेले, त्यापैकी १५३ जण अतिवृष्टी व पुरामुळे, तर १३५ जण वीज कोसळून मृत्युमुखी पडले.> हिमाचल प्रदेशात १४१ जणांचा बळी गेला. जोरदार पावसामुळे झालेल्या भूस्खलन व अचानक आलेल्या पुराचा हा मुख्य परिणाम होता.> जम्मू-काश्मीरमध्ये १३९ मृत्यू, तर महाराष्ट्रात १३५ मृत्यू, प्रामुख्याने पुरामुळे झाले.> उत्तर प्रदेशात २०१ मृत्यू, त्यापैकी ११२ वीज कोसळल्यामुळे व ६९ अतिवृष्टीमुळे झाले.> झारखंडमध्ये १२९ मृत्यू, त्यापैकी ९५ वीज कोसळून झाले.> बिहारमध्ये ६२ जणांचा मृत्यू, सर्व वीज कोसळण्यामुळे झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Monsoon Mayhem: Heavy Rains, Floods Claim 1,528 Lives in India

Web Summary : This monsoon season's extreme weather events, including floods and lightning, caused 1,528 deaths across India, according to the India Meteorological Department. Madhya Pradesh, Himachal Pradesh, and Maharashtra were the worst-hit states. The country received 8% more rainfall than average, with eastern regions experiencing significant deficits.
टॅग्स :floodपूरRainपाऊसIndiaभारतDeathमृत्यू