शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिरासाठी कायदयाच्या मागणीला संघाचा पाठिंबा नाही

By admin | Updated: September 13, 2016 06:23 IST

भगवान श्रीरामाला आठ हजार वर्षांपासून हिंदू प्रजेने आदर्श मानले. इथे जन्मलेले पुरुषोत्तम श्रीराम, श्रीकृष्ण, बुद्ध, महावीर सर्वांचेच आहेत

सुरेश भटेवरा, नवी दिल्लीभगवान श्रीरामाला आठ हजार वर्षांपासून हिंदू प्रजेने आदर्श मानले. इथे जन्मलेले पुरुषोत्तम श्रीराम, श्रीकृष्ण, बुद्ध, महावीर सर्वांचेच आहेत. आपल्या श्रद्धा, पूजा, जीवनक्रमाच्या वाटचालीत कोणताही बदल न करता, भारताचे सारे रहिवासी प्रथमत: हिंदू आहेत, ही बाब मान्य केली, तर हिंदुंच्या या देशात राम मंदिर झालेच पाहिजे. तथापि, जो वाद आज न्यायप्रविष्ट आहे, त्याचा निवाडा करणाऱ्या न्यायालयाला टाळून रामजन्मभूमीसाठी संसदेला नवा कायदा करण्यास भाग पाडा, या रामजन्मभूमी न्यासाचे कार्याध्यक्ष रामविलास वेदान्ती यांनी संमेलनात मांडलेल्या प्रस्तावाला मी पाठिंबा देत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.विज्ञान भवनात संत गुलाबराव महाराज जीवनशताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित ९ व्या संत साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संमेलनात ६ परिसंवादानंतर एकूण ९ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. अयोध्येत रामजन्मभूमीच्या जागेवर राम मंदिर बांधण्याचा आग्रह धरणारा प्रस्तावही त्यात होता. केंद्र व राज्य सरकारांकडून या प्रस्तावांना सरसंघचालकांनी मान्यता मिळवून द्यावी, असा आग्रह डॉ. रामविलास वेदान्ती, आचार्य धर्मेंद्र आदींनी भाषणातून धरला. तेव्हा राम मंदिराचा प्रस्ताव वगळता, बाकीचे सारे प्रस्ताव आपल्याला मान्य असल्याचे भागवतांनी जाहीर केले. गुलाबराव महाराजांच्या साहित्यकृतीचा गौरवपूर्ण उल्लेख करीत भागवत म्हणाले, ‘आमच्या ॠषी मुनींनी सतत विश्वाचे कल्याण व्हावे, हाच विचार केला. विनम्र राहा, अहंकार बाळगू नका, अशी शिकवण ही संस्कृती देते. तीन प्रकारच्या कर्मशक्तीत चांगल्या गोष्टींचा पुरस्कार करण्याची आणि वाईट गोष्टी रोखण्याची क्षमता आहे. संत गुलाबराव महाराजांनी निर्माण केलेल्या साऱ्या साहित्यकृती याचाच पुरस्कार करणाऱ्या आहेत. आपल्या अल्प आयुष्यात महाराजांनी देश-विदेशातील ज्ञानाचा परामर्श घेउन जे अभंग, ओव्या, पदे व ज्या साहित्याची निर्मिती केली, ते प्रेरणादायी आहे.’महाराष्ट्रातल्या बहुसंख्य वारकऱ्यांचा सहभागसमारोप सोहळयाचे स्वागत व प्रास्ताविक संमेलनाचे स्वागताध्यक्ष विश्वनाथ कराड यांनी केले. समारोपप्रसंगी महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, सर्वोदय ट्रस्टचे नारायण महाराज मोहोड, डॉ. विजय भटकर, आचार्य धर्मेंद्र, डॉ. रामविलास वेदान्ती व बंगलोरच्या नाव एकता मिशनचे महायोगी मधुकरनाथजी यांची संत गुलाबराव महाराजांच्या कर्मयोगाचा गौरव करणारी भाषणे झाली. सूत्रसंचालन किशन शर्मांनी केले.दुसऱ्या दिवसाचा प्रारंभ ‘तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थ क्षेत्राकडे’ या परिसंवादाने झाली. त्याचे अध्यक्षस्थान डॉ. विजय भटकरांनी भूषवले.‘सर्व धर्मग्रंथ हे खऱ्या अर्थाने जीवन ग्रंथ’ या परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड होते. या परिसंवादांमधे मुख्यत्वे अविनाश धर्माधिकारी, इंद्रेशकुमार, डॉ.एस.एन.पठाण, नारायण महाराज जाधव, डॉ. संजय उपाध्ये, रामेश्वर शास्त्री आदींचा सहभाग होता. संमेलनात महाराष्ट्रातल्या बहुसंख्य वारकऱ्यांसह दिल्ली परिसरातील निमंत्रितही मोठ्या संख्येने उपस्थित होते.