NCP SP MP Supriya Sule In Parliament Winter Session 2025: राज्यातील सर्व २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी एकत्रितपणे जाहीर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर तसेच औरंगाबाद खंडपीठाने निवडणूक आयोगाला दिला. दुबार मतदारांमुळे गाजलेल्या निवडणुकीचा 'दुबार' निकाल टळला. अनेक ठिकाणी 'दुबार' मतदारांमुळे मतदानावेळी गोंधळ उडाला. राज्यात दुपारी ३.३० पर्यंत सरासरी ४७.५१ टक्के मतदान झाल्याचे सूत्रांनी सांगितले. नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांच्या मतदानावेळी झालेल्या गोंधळाचे पडसाद संसदेत उमटले. संसदेच्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा मांडत महाराष्ट्रातील महायुती सरकारवर टीका केली.
महाराष्ट्रात मंगळवारी नगरपंचायत आणि नगरपरिषदेची जी निवडणूक झाली, त्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असे झाले की, प्रचंड मारामाऱ्या, बंदुका दाखवणे आणि एवढा सगळा गोंधळ या निवडणुकीत झाला. असे याआधी महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही झालेले नाही, या शब्दांत सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला.
शेतकऱ्यांना न्याय द्यायचे काम सरकारकडून होत नाही
कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि मदतीचा जो प्रस्ताव होता तो अद्याप महाराष्ट्र सरकारने दिला नाही. यावर, खरे तर हे दुर्देव आहे की, सत्तेत येताना महायुतीमधील नेते वारंवार सांगत होते की, आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. शेतकऱ्यांना अतिवृष्टीत मदत करू. पण आता तसे होताना दिसत नाही. शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना न्याय द्यायचे काम सरकारकडून होत नाही. त्यामुळे केंद्र सरकारला माझी विनंती आहे की, महाराष्ट्रात झालेला हा सर्व सावळा गोंधळ पाहता केंद्र सरकारने राज्य सरकारला विनंती करावी की, शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव तातडीने घ्यावा. कारण शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दरम्यान, मतमोजणी २१ डिसेंबरला असल्याने मतदान यंत्रे १९ दिवस सुरक्षित ठेवण्याचे आव्हान निवडणूक आयोगासमोर आहे. मतदान यंत्राच्या सुरक्षेसाठी २४ तास सशस्त्र चोख सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचे आदेश आयोगाने दिले. उमेदवारांच्या मनात शंका राहू नये, यासाठी त्यांच्या प्रतिनिधींना गोदामाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पहारा देण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मतदान यंत्रे ठेवण्यात येणाऱ्या गोदामाच्या व्यवस्थापनासाठी जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. गोडाऊन बाहेर सीसीटीव्ही, सुरक्षा अलार्म यंत्रणा कार्यान्वित असल्याची खात्री करावी. आवश्यक तिथे बॅरेकेटींग करावे, गोदामाच्या ठिकाणी केवळ अधिकृत व्यक्तींनाच लॉगबुकमध्ये नोंद करून प्रवेश देण्यात यावा.
Web Summary : Supriya Sule raised concerns in Parliament about irregularities during Maharashtra's municipal elections, citing violence and voter fraud. She criticized the state government for neglecting farmers' welfare and urged central intervention for pending aid.
Web Summary : सुप्रिया सुले ने महाराष्ट्र के नगर पंचायत चुनावों में अनियमितताओं पर संसद में चिंता जताई, हिंसा और मतदाता धोखाधड़ी का हवाला दिया। उन्होंने राज्य सरकार पर किसानों के कल्याण की उपेक्षा करने का आरोप लगाया और लंबित सहायता के लिए केंद्रीय हस्तक्षेप का आग्रह किया।