शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 17:02 IST

'काँग्रेसने पावसाळी अधिवेशनात बराच वेळ वाया घालवला आहे. आता आम्हाला अधिक वेळ वाया घालवायचा नाही.'

Parliament Session:संसदेच्या पावसाळी अधिवेशन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने गदारोळ पाहायला मिळत आहे. या गोंधळामुळे एक दिवसही कामकाज व्यवस्थित होऊ शकले नाही. विरोधक सातत्याने मतदार यादीतील घोटाळा आणि विशेष सखोल पुनर्निरक्षण (SIR) या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी करत आहेत. मात्र, सरकारने स्पष्टपणे सांगितले की, संसदेचा बराच वेळ वाया गेला आहे. त्यामुळे आता दोन्ही सभागृहात फक्त विधेयके मंजूर होतील. 

केंद्रीय संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी पावसाळी अधिवेशनात बराच वेळ वाया घालवला आहे. आता आम्हाला अधिक वेळ वाया घालवू द्यायचा नाही. आता आम्ही लोकसभा आणि राज्यसभेतून महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेऊ. आजही विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे वेळ मागितला, आयोगाने ३० सदस्यांना चर्रेसाठी बोलावले, पण ते गेलेच नाहीत.

एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसानएक व्यक्ती आणि एक कुटुंबाच्या मूर्खपणामुळे देश इतका मोठा तोटा सहन करू शकत नाही. अनेक विरोधी खासदारही म्हणाले की, ते असहाय्य आहेत. त्यांचे नेते त्यांना गोंधळ घालण्यास भाग पाडतात. आम्ही देशाचा आणि संसदेचा वेळ एकाच मुद्द्यावर वाया जाऊ देणार नाही. म्हणूनच, आम्ही आता महत्त्वाची विधेयके मंजूर करुन घेऊ. राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक, २०२५ आणि राष्ट्रीय डोपिंग विरोधी सुधारणा विधेयक, २०२५ पुढील विचार आणि मंजूरीसाठी लोकसभेत ठेवण्यात आले, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

कोणाच्या इशाऱ्यावर विरोधक प्रतिमा मलिन करत आहेत?रिजिजू पुढे म्हणाले, हे लोक संसदेवर किंवा निवडणूक आयोगावर विश्वास ठेवत नाहीत. कोणाच्या इशाऱ्यावर हे लोक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही विरोधी पक्षांना चर्चेत सहभागी होण्याची शेवटची विनंती करत आहोत. महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा करा आणि जर काही सुधारणा असतील तर द्या, परंतु चर्चेत सहभागी व्हा. विरोधी पक्षाने त्यांची जबाबदारी समजून घ्यावी. मी इतका बेजबाबदार विरोधी पक्ष कधीच पाहिला नाही, अशी टीका रिजिजूंनी यावेळी केली.

 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसParliamentसंसदRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी