शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 15:03 IST

उत्तर प्रदेशातील महाराजपूर परिसरात एका वधूने 'वराचे हात थरथरत आहेत' हे लक्षात येताच लग्न करण्यास ठाम नकार दिला.

विवाहाचे सर्व विधी सुरू असताना, एक अनपेक्षित क्षण सगळ्या समारंभावर पाणी फिरवणारा ठरला. उत्तर प्रदेशातील महाराजपूर परिसरात एका वधूने 'वराचे हात थरथरत आहेत' हे लक्षात येताच लग्न करण्यास ठाम नकार दिला. यामुळे समारंभात एकच खळबळ उडाली असून, हा प्रकार सध्या स्थानीय पातळीवर चर्चेचा विषय ठरला आहे.

वधूचा थेट नकार; "मी हे लग्न करणार नाही"मिळालेल्या माहितीनुसार, महाराजपूरमधील एका गावातील मुलीचे लग्न शिवली परिसरातील तरुणासोबत ठरले होते. शुक्रवारी संध्याकाळी वराची मिरवणूक वधूच्या घरी आली. द्वारचाराचे विधी सुरळीत पार पडले. स्टेजवर हार घालण्याचा कार्यक्रम सुरू असताना, वधूच्या लक्षात आलं की वराचे हात सतत थरथरत आहेत.

वधूने लगेच प्रश्न विचारला की, “तुमचे हात का थरथरत आहेत?” यावर वराने मौन साधले. पण, त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की तो घाबरलेला आहे, पण वधूने ही कारणे स्पष्टपणे फेटाळून लावली. तिने म्हटले, "तो आजारी असावा किंवा त्याने दारू घेतली आहे. मी अशा व्यक्तीशी लग्न करू शकत नाही."

पंचायत झाली पण निर्णय बदलला नाही!या नकारामुळे लग्नस्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही कुटुंबांमध्ये वाद सुरू झाले. यानंतर पंचायत बोलावण्यात आली, पण वधू आपल्या निर्णयावर ठाम राहिली. शनिवारी सकाळपर्यंत संवाद सुरू होता. काही स्थानिक प्रतिष्ठित लोकांनी मध्यस्थी केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

नशेत होता वर?वधूच्या नातेवाईकांनी आरोप केला की, वर दारूच्या नशेत होता. वरातीच्या वेळीदेखील त्याचे हात थरथरत असल्याचे काही पाहुण्यांनी देखील सांगितले. नववधूने स्वाभिमानाने निर्णय घेत, लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. अखेर वराला वधूशिवाय वरात परत न्यायची वेळ आली. लग्न मोडल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये पंचायतीच्या माध्यमातून खर्चाची देवाणघेवाण करण्यात आली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी