शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

टोमॅटोने चांगलाच भाव खाल्लाय, सांगा कोण जबाबदार, तुम्ही की आम्ही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 06:21 IST

एरवी भाव न मिळाल्याने रस्त्यांवर फेकून दिला जाणारा टोमॅटो सध्या दरवाढीमुळे चर्चेत आहे... पण ही स्थिती का आली?

पवन देशपांडे, आठवतंय ? दोन-तीन महिन्यांपूर्वी देशभरात ठिकठिकाणी लाल चिखल पाहायला मिळाला होता. टोमॅटोला अगदी एक-दोन रुपये भाव मिळू लागल्याने नाईलाजाने असंख्य शेतकऱ्यांना त्यांनी कष्टाने पिकवलेला माल डोळ्यांदेखत रस्त्यावर फेकावा लागला होता... आता याच टोमॅटोला पेट्रोलपेक्षाही जास्त भाव आलाय... शेतकऱ्यांसाठी हे सुखावह आहेच... ते असायलाच हवे... त्यांच्या मालाला चांगला बाजारभाव मिळायलाच हवा.. यात कुठलीही शंका नाही. पण, कधी शेतकऱ्यांना रडकुंडीला आणणारे भाव तर कधी सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला चाट देणारे दर... यात मध्यम मार्ग कधी निघत नाही का ? परवडेना म्हणून अनेक हॉटेल्सनी टोमॅटोचा वापरच बंद केला. काहींनी तर आपल्याकडील टोमॅटोच्या पदार्थांचे दर दुप्पटही केले. दुसरीकडे रिझर्व्ह बँकेनेही टोमॅटोच्या वाढत्या किमतीबद्दल चिंता व्यक्त केली. म्हणे आता टोमॅटोमुळे महागाई दर वाढू शकतो. (शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळत असतील, काय हरकत आहे ?) 

दोन महिन्यांत असे कोणते चित्र पालटले की, आधी १-२ रुपये दर शेतकऱ्यांना मिळत असताना अचानक तो शंभरीच्या पुढे गेला ? टोमॅटोच्या भावात ७०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली ? दोन महिन्यांपूर्वी ज्या शेतकऱ्यांनी आपला टोमॅटो रस्त्यावर फेकला त्यांच्या मनाची किती घालमेल सुरू असेल आणि आता त्यांच्या शेतात टोमॅटो नाही, म्हणून ते नशिबाला किती दोष देत बसले असतील? आणि निश्चितच आता टोमॅटोला भाव मिळतोय म्हणून ज्यांचा माल विकला जातो, त्यांच्यासाठी सुखावह आहेच. पण, दरातील हा एवढा चढउतार कशामुळे ? हा प्रश्न आहेच. 

गेल्या महिन्यात बिपोरजॉय वादळ आले. गुजरातमधून ते पोहोचले थेट राजस्थानात. या अवकाळीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. उत्तर प्रदेशातही तेच. महाराष्ट्र आणि कर्नाटकात किडीने हैराण केले. त्यामुळे टोमॅटोचे उत्पादन घटले. साडेपाच लाख क्विंटल टोमॅटो बाजारात येत होता, तो अर्ध्यावर आलाय.  एकीकडे दोन महिन्यांआधी शेतकऱ्यांना रडू असे भाव तर दुसरीकडे दोन महिन्यांनी ग्राहकांच्या डोळ्यांत अश्रू येतील असे दर. हे टाळायचे कसे, याचे उत्तर सध्यातरी कोणाकडेच नाही. सरकार यावर उपाय शोधू इच्छिते. अशी स्थिती कशी टाळावी, याच्या आयडिया मिळवण्यासाठी सरकारने चक्क स्पर्धाही भरवली आहे. टोमॅटो ग्रॅंड चॅलेंज आपण घेत असल्याचे आणि लोकांनी त्यावर आयडिया शेअर कराव्यात, असे आवाहनच ग्राहक व्यवहार  खात्याच्या सचिवांनी केले आहे. यातून समस्या मिटली तर उत्तमच पण, आणखीही प्रश्न आहेत, ते सोडवणेही गरजेचे आहे. 

कोल्ड स्टोरेजची संख्या वाढवणे आणि ते शेतकऱ्यांना उपलब्ध असणे ही गरज आहे. शीतगृहांमध्ये बटाट्यांचे प्रमाणच अधिक आहे. टोमॅटो लवकर खराब होतो. त्यामुळे त्याची काळजी अधिक घ्यावी लागते, त्यांची विक्रीही कमी दिवसांत पूर्ण करावी लागते, ही समस्याही दरांच्या वाढत्या आणि घसरत्या किंमतींमध्ये आहे. टोमॅटोचे भरमसाठ उत्पादन झाले तर ते जास्तीत जास्त टिकवून ठेवता येणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना ही सुविधा उपलब्ध झाल्यास, एकाच वेळी भरमसाठ माल बाजारात येणार नाही आणि शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. तसेच भाव वाढही भरमसाठ होणार नाही. मागणी आणि पुरवठा यांचे प्रमाण संतुलित राहील. पण, ही योग्य स्थिती सध्यातरी स्वप्नवत आहे. ती प्रत्यक्षात यावी, हीच इच्छा.

एवढ्यावर भागेल का? टोमॅटो स्वस्तात विकण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानंतर तो टोमॅटो जिथे मागणी जास्त तिथे कमी दरात विकला जाईल. त्यातून किती स्वस्ताई येईल, टोमॅटो खरेदी करून सरकार किती दिवस ठेवू शकणार, किती काळ विकू शकणार असे प्रश्न आहेतच. 

एवढं सगळं घडण्याचं कारण काय ? एप्रिल-जून महिन्यात जे पीक बाजारात येते त्याची लागवड जानेवारी-मार्चमध्ये केली जाते. यंदा या काळात काही ठिकाणी प्रचंडउष्णता आणि काही ठिकाणी अवकाळी पाऊस होता. त्यामुळे टोमॅटोवर किडीचा हल्ला झाला. कर्नाटक आणि महाराष्ट्रात कमी उत्पादन झाले. मे महिन्यात झालेल्या बेमोसमी पावसानेही टोमॅटो पिकांचे नुकसान केले. त्यामुळे बाजारात टोमॅटो कमी प्रमाणात यायला सुरुवात झाली. साहजिकच टोमॅटोचे भाव वाढले.

असे भाव कधीपर्यंत?गेल्या काही महिन्यांत टोमॅटोचे दर कोसळल्याने अनेक शेतकऱ्यांनी हे पीक पुन्हा घेतलेच नाही. ज्यांनी घेतले त्यांना आता चांगला भाव मिळाला. आता वाढलेले भाव आणखी काही आठवडे राहू शकतात. या भावातील चढउतारावर सरकारने उपाय शोधणे गरजेचे आहे, असे मत टोमॅटो व्यावारी अजित बोरोडे यांनी व्यक्त केले.

(लेखक लोकमत मुंबईत आवृत्तीचे सहायक संपादक आहेत)

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्या