शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादाविरोधात लढण्याची शपथ घ्या!

By admin | Updated: November 27, 2014 02:56 IST

सहा वर्षापूर्वी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे स्मरण देत दहशतवादाविरुद्ध लढण्याची सार्क देशांनी शपथ घ्यावी, असे आवाहन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सार्क देशांना आवाहन
 
26/11च्या स्मृतिदिनी टाळली शरीफ यांची भेट
 
पाकला दिला अप्रत्यक्ष इशारा
 
काठमांडू : सहा वर्षापूर्वी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे स्मरण देत दहशतवादाविरुद्ध लढण्याची सार्क देशांनी शपथ घ्यावी, असे आवाहन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे केले. पाकिस्तानी हल्लेखोरांनी 166 जणांचे प्राण घेतलेला हा हल्ला आपण आजही विसरू शकत नाही, असे भावनिक उद्गार सार्कच्या व्यासपीठावरून त्यांनी काढले. भाषणाच्या सुरुवातीस मोदी यांनी इतर देशांच्या प्रमुखांचा सन्मानपूर्वक उल्लेख केला, पण पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे नाव घेतले नाही. शिवाय 26/11 च्या स्मृतिदिनी शरीफ यांची भेटगाठही टाळली. मोदींनी या सूचक कृतीतून पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशाराच दिला. 
मुंबईवरील हल्ल्याच्या भयानक स्मृती आजही पाठ सोडत नाहीत. या हल्ल्यात मरण पावलेल्या लोकांच्या स्मृतींमुळे आजही वेदना होतात. आज यानिमित्ताने आपण दहशतवाद व आंतरराष्ट्रीय गुन्हे यांचा बीमोड करण्याची शपथ घेऊ, असे मोदी यांनी सार्क नेत्यांना सांगितले. पंतप्रधानांचे हे भाषण 3क् मिनिटांचे होते. मोदी यांनी भारताचे विविध महत्त्वाच्या क्षेत्रंतील निर्णय जाहीर केले. आरोग्य, विज्ञान, व्हिसा व सार्क राष्ट्रांशी संबंध दृढ करण्याचे निर्णय त्यांनी यावेळी जाहीर केले. 
 
मुंबई हल्ला विसरू शकत नाही
मुंबईवर सहा वर्षापूर्वी झालेला हल्ला आपण विसरू शकत नाही, असे ठणकावून सांगणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ सार्कच्या व्यासपीठावर एकत्र आले खरे पण; मोदी यांनी शरीफ यांच्या उपस्थितीकडे लक्षही दिले नाही. 
 
प्रशांत महासागराच्या मध्य भागापासून अटलांटिक सागराच्या द. किना:यार्पयत मला एकतेची लाट दिसली आहे. सीमावाद प्रगतीला अडसर ठरतो. आंतरराष्ट्रीय सहकार्याने विकासाला चालना मिळते. - पंतप्रधान मोदी
 
च्सर्वाच्या प्रय}ाने दक्षिण आशिया शांत व समृद्ध करू या. उर्वरित जगापेक्षा दक्षिण आशियात सामूहिक प्रय}ांची अधिक गरज आहे. भारत, श्रीलंका, बांगलादेश, भुतान, पाकिस्तान, नेपाळ, मालदीव व अफगाणिस्तान हे आठ देश एकत्र आले पाहिजेत. 
च्चांगले शेजारी ही आंतरराष्ट्रीय आकांक्षा आहे. आपल्याला एकमेकांच्या सुरक्षेची काळजी असेल तर आपली मैत्री अधिक दृढ होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.