शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

टी. एन. शेषन नावाचे वादळ

By admin | Updated: September 28, 2014 01:26 IST

भारतातील निवडणुकांचा इतिहास लिहिला गेलाच तर त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्तपद भूषवलेल्या टी. एन. शेषन यांच्यावर एक मोठा अध्याय लिहिल्याशिवाय तो पूर्णच होऊ शकणार नाही.

धी भारतातील निवडणुकांचा इतिहास लिहिला गेलाच तर त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्तपद भूषवलेल्या टी. एन. शेषन यांच्यावर एक मोठा अध्याय लिहिल्याशिवाय तो पूर्णच होऊ शकणार नाही. निवडणूक आचारसंहिता कठोरपणो राबवण्याच्या त्यांच्या आग्रहामुळेच आज निवडणूक प्रचारासह अन्य प्रक्रियेतील आमूलाग्र बदल पाहावयास मिळत आहेत. 
कोणत्याही उमेदवाराची, त्याच्या नातेवाइकांची हेटाळणी करू नका, भ्रष्ट मार्गाचा अवलंब करू नका, परवानगीशिवाय कुणाचीही जागा, इमारत, भिंत प्रचारासाठी वापरू नका; दुस:यांच्या प्रचारसभांमध्ये अडथळे आणू नका. योग्य परवान्याखेरीज मतदान केंद्रात प्रवेश करू नका, डाकबंगल्यातील सर्व खोल्या ताब्यात घेऊ नका, निवडणूक जाहीर झाल्यावर संपूर्ण कर्जमाफी करू नका. 
सरकारी विमानांचा गैरवापर करू नका. निवडणुकीची कामे आणि कचेरीतील कामे एकाचवेळी करू नका, तुमच्या सत्तारूढ पक्षाने काय काय कामे केली हे सांगण्याठी जनतेचा पैसा वापरून जाहिराती देऊ नका. अगदी माणुसकीच्या दृष्टिकोनातून आवश्यक तेवढय़ाच अनुदानांना मान्यता द्या. मंत्र्यांनी व इतरांनी आर्थिक अनुदानाच्या घोषणा करू नका, असे अनेक नियम आचारसंहितेत आहेत. प्रत्यक्षात मात्र या नियमांचे पालन होत नव्हते. शेषन यांनी आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी कशी होईल, यावर भर दिला; कठोर निर्णय घेतले आणि आज एकूणच निवडणूक प्रचार पद्धतीत झालेला कमालीचा बदल पाहावयास मिळत आहे तो त्यामुळेच. त्याआधी मतदारांना प्रभावित करण्यासाठी कोणकोणते मार्ग खुलेआम वापरले जात हे सर्वश्रुत आहे. निवडणूक आचारसंहितेच्या पालनाबाबत ते इतके आग्रही असत की शेषन यांनीच आचारसंहिता तयार केली की काय, असा अनेकांचा गैरसमज झाला होता. मात्र ती आपण तयार केली नसून, केवळ त्यावर सही करण्याचे काम केल्याचे ते सांगत. आपली निवडणूक प्रक्रिया कमालीची दोषपूर्ण आणि एक विनोद असल्याचे त्यांचे मत होते. तुम्हाला या देशात कायदेशीर निवडणुका व्हायला हव्या असतील, तर कृपा करा आणि निवडणूक आयोगाला स्वायत्तता द्या, असे त्यांनी सरकारला सुनावले होते. अनेक नेत्यांशी त्यांचे वेगवेगळ्य़ा कारणांवरून मतभेद आणि वादही झाले होते. निवडणुकांना हानी पोचवणारे दीडशे मार्ग शोधून काढल्याचा दावा त्यांनी केला होता. एकूणच शेषन हे निवृत्त होऊन 18 वर्षे झाली तरी निवडणूक म्हटले की त्यांचे नाव आठवतेच. निवडणूक प्रक्रियेवर त्यांच्या कामगिरीचा कितपत परिणाम झाला, हे तर आपण पाहतोच आहोत.
 
कायम चर्चेत राहिलेली व्यक्ती
शेषन हे वेगवेगळ्य़ा कारणांनी कायमच चर्चेत आणि प्रसिद्धीच्या झोतात राहिलेले व्यक्तिमत्त्व. 1991 ते 1996 या कालावधीत ते निवडणूक आयुक्तपदाच्या कारकिर्दीत मुख्य निवडणूक आयुक्त होते. 1991 साली सरकारने सर्व पक्षांशी चर्चा करून एकूण सहा भागांची आदर्श आचारसंहिता तयार केली होती. मात्र तत्कालीन सरकारने त्यांना निवडणूक पद्धतीत आवश्यक असलेल्या सुधारणांचा एक तपशीलवार अहवाल तयार करून आपल्याकडे पाठवण्यास सांगितले होते. 10 फेब्रुवारी 1992 रोजी शेषन यांनी तो अहवाल सरकारकडे पाठवून दिला. मात्र मे 1994 र्पयत त्यांना त्याची पोहोचही मिळाली नव्हती  !
 
- रवींद्र राऊळ