शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
5
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
6
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
7
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
8
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
9
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
10
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
11
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
12
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
13
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
14
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
15
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
16
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
17
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
18
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
19
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
20
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

सर्वोच्च न्यायालयाने दिला निकाल, ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'या निर्णयाचं समर्थन करू शकत नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 17:12 IST

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला. या निकालाने पश्चिम बंगाल सरकारला झटका बसला आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या सरकारला सुप्रीम कोर्टाच्या निकालाने झटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने २५००० शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्याच्या निर्णय कायम ठेववण्याचा निकाला दिला आहे. भाजपचा उल्लेख करत ममता बॅनर्जींनीसर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भूमिका मांडली आहे. मी या निकालाचे समर्थन करू शकत नाही, असे त्या म्हणाल्या. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमधील २५००० शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. या निकालानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक पत्रकार परिषद घेत सरकारची भूमिका मांडली. 

ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'एक नागरिक म्हणून मी म्हणत आहे की, या निर्णयाचे समर्थन मी करू शकत नाही. मला आशा होती की हे मोडून तोडून मांडलं जाणार नाही. न्यायालयाने म्हटले आहे की, उमेदवार शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द केल्या जात असल्याचे सांगितले. पण, जे शिक्षक आधीपासून कार्यरत आहेत, त्यांच्याकडून दिलेले पैसे परत घेतले जाणार नाही.'

वाचा >>अयोध्येप्रमाणेच आता बंगालमध्येही उभं राहणार भव्य राम मंदिर; ममतांच्या आवाहनानंतर सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा

'सर्वच शिक्षक दोषी असू शकत नाही. ज्यांना तुम्ही दोषी ठरवत आहात, त्यांच्या विरोधात आमच्याकडे कोणताही पुरावा नाहीये. भाजप सरकारला पश्चिम बंगालमधील शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करायची आहे का? मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळ्यात काय झाले? 50 पेक्षा जास्त लोकांची हत्या केली गेली', अशा शब्दात ममता बॅनर्जी भाजपवर निशाणा साधला. 

दोषी नसलेले उमेदवार सहभागी होऊ शकतात -बॅनर्जी

ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, 'जे उमेदवार दोषी नाहीत. ते नवीन भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात. आम्ही हा निर्णय स्वीकारून पुढील तीन महिन्यात नवीन नियुक्त्या करण्याची प्रक्रिया पूर्ण करू. एसएससी एक स्वायत्त संस्था आहे. पण आम्ही हे सुनिश्चित करू की पात्र शिक्षकांच्या नियुक्त्या तातडीने होतील', अशी माहिती ममता बॅनर्जी यांनी दिली. 

सर्वोच्च न्यायालयाने २५००० शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती रद्द करण्याच्या कोलकात्ता न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. शिक्षक आणि शिक्षकेत्तर पदासाठी उमेदवारांची निवड करतानाच्या प्रक्रियेत छेडछाड झाली असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. 

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयTeacherशिक्षकEducationशिक्षण