शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
3
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
4
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
5
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
6
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
7
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
8
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
9
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
10
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
11
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
12
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
13
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
14
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
15
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
16
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
17
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
18
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
19
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

थेट लग्नपत्रिकेतून तरुणाने दिला 'सीएए'ला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 15:34 IST

मध्य प्रदेशातील एका तरुणाने थेट आपल्या लग्नपत्रिकेच्या माध्यमातून सीएएला पाठिंबा दर्शवला आहे. 

ठळक मुद्देमध्य प्रदेशातील एका तरुणाने थेट आपल्या लग्नपत्रिकेच्या माध्यमातून सीएएला पाठिंबा दर्शवला आहे. प्रभात असं या तरुणाचं नाव असून त्याने लग्नपत्रिकेवर I Support CAA असा मजकूर लिहिला आहे.संभळ जिल्ह्यातील एका कुटुंबानेदेखील लग्नात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पाठिंबा दिला आहे.

भोपाळ - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची एकजूट होत आहे. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात ठिकठिकाणी विरोधी पक्षांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाकडून सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. याच दरम्यान मध्य प्रदेशातील एका तरुणाने थेट आपल्या लग्नपत्रिकेच्या माध्यमातून सीएएला पाठिंबा दर्शवला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमधील नरसिंहपूर जिल्ह्यातील एका तरुणाने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी आपल्या लग्नपत्रिकेवरच पाठिंबा दर्शवला आहे. प्रभात असं या तरुणाचं नाव असून त्याने लग्नपत्रिकेवर I Support CAA असा मजकूर लिहिला आहे. शनिवारी (18 जानेवारी) प्रभातचा विवाह संपन्न झाला. 'नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत जनजागृती व्हावी. या कायद्यासंबंधीत सर्व गोष्टी लोकांना समजाव्यात यासाठी सीएएला पाठिंबा देत आहे. त्यामुळे लग्नपत्रिकेवर I Support CAA असा मजकूर लिहिण्याचा निर्णय घेतला' अशी माहिती प्रभातने दिली आहे. 

उत्तर प्रदेशातील संभळ जिल्ह्यातील एका कुटुंबानेदेखील लग्नात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पाठिंबा दिला आहे. लग्नपत्रिकेवर We support CAA and NRC असं मोठ्या अक्षरात छापण्यात आले आहे. मोहीत मिश्रा आणि सोनम पाठक यांचा विवाह 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यांनी लग्नपत्रिकेत सीएए आणि एनआरसीला पाठिंबा दर्शवला आहे. या लग्नपत्रिका सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. 

केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते प्रताप सारंगी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. प्रताप सारंगी यांनी शनिवारी (18 जानेवारी) काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्या लोकांना भारताची अखंडता आणि वंदे मातरम मान्य नाही. त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही असं सारंगी यांनी म्हटलं आहे. तसेच देशाच्या विभाजनाच्या पापाचं प्रायश्चित म्हणजे नागरिकत्व दुरुस्ती कायदा असल्याचं म्हटलं आहे. गुजरातमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. 

'देशाच्या विभाजनाचं पाप तर काँग्रेसने केलं होतं मात्र त्याचं प्रायश्चित तर आम्ही करत आहे. त्यामुळेच यासाठी काँग्रेसने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचं स्वागत केलं पाहीजे' असं भाजपाच्या प्रताप सारंगी यांनी म्हटलं आहे. तसेच 'या कायद्याला विरोध का केला जात आहे? कारण त्याचं अस्तित्व संपुष्टात येत आहे. त्यामुळेच ते देशामध्ये आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. जे लोक अशापद्धतीचं काम करतात त्यांना देशप्रेमी मानलं जात नाही. ज्यांना भारताचं स्वातंत्र्य, अखंडता आणि वंदे मातरम मान्य नाही त्यांना या देशामध्ये राहण्याचा कोणताही अधिकार नाही' असं देखील सारंगी यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

24 जानेवारीला महाराष्ट्र बंद; आंबेडकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट 

Delhi Election: काँग्रेसमध्ये घराणेशाही, पक्षातील नेत्यांच्या डझनभर मुला-मुलींना उमेदवारी

प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा कोकणकड्यावरून पडून मृत्यू

India Vs Australia Live Score: ऑस्ट्रेलियाचे शतक, स्मिथ-लाबुशेनची अर्धशतकी भागीदारी

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशmarriageलग्न