शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

15 मजूर खाणीत अडकले अन् तिकडे मोदी फोटो काढण्यात दंग- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 17:05 IST

मेघालयमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून कोळशाच्या खाणीत 15 खनिकर्मचारी अडकले आहेत.

ठळक मुद्देमेघालयमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून कोळशाच्या खाणीत 15 खनिकर्मचारी अडकले आहेत.अद्यापही त्यांना खाणीतून बाहेर काढण्यात यश मिळालेलं नाही. त्या कोळशाच्या खाणीत अडकून पडलेल्या खनिकर्मचाऱ्यांना वाचवण्याची मागणी राहुल गांधींनी मोदींकडे केली आहे.

शिलाँग- मेघालयमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून कोळशाच्या खाणीत 15 खनिकर्मचारी अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी अभियान राबवलं जातंय. परंतु अद्यापही त्यांना खाणीतून बाहेर काढण्यात यश मिळालेलं नाही. याच मुद्द्याचा आधार घेत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे. तसेच त्या कोळशाच्या खाणीत अडकून पडलेल्या खनिकर्मचाऱ्यांना वाचवण्याची मागणी राहुल गांधींनी मोदींकडे केली आहे.13 डिसेंबर रोज मेघालयातील एका कोळशाच्या खाणी 15 खनिकर्मचारी अडकून पडले आहेत. राहुल गांधींनी केंद्र सरकारवरही गंभीर आरोप केले आहेत. केंद्र सरकारनं त्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी हाय प्रेशर पंपाची व्यवस्था करण्यास नकार दिला आहे. पंतप्रधानांनी या खनिकर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न केले पाहिजेत. राहुल गांधी ट्विट करत म्हणाले, पाण्यानं भरलेल्या कोळशाच्या खाणीत गेल्या आठवड्यात 15 खनिकर्मचारी अडकले आहेत. त्यांना त्या खाणीत श्वास घेण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोगीबील सेतूवर कॅमेऱ्यांसमोर पोज देत फिरत आहेत. त्यांच्या सरकारनं त्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी हाय प्रेशर पंप देण्यास नकार दिला आहे.तत्पूर्वी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही मोदींवर टीका केली होती. 11 दिवस 15 खनिकर्मचारी मेघालयात अडकून पडले आहेत. खाणीतून पाणी काढण्याचं काम जलदगतीनं केलं पाहिजे. एक एक मिनिट महत्त्वपूर्ण आहे. मोदी सरकारकडूनही उशिरानं यावर प्रतिक्रिया येत आहे. त्या खनिकर्मचाऱ्यांचा जीव वाचावा, यासाठी मी प्रार्थना करत असल्याचंही सुरजेवाला म्हणाले आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी