शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

15 मजूर खाणीत अडकले अन् तिकडे मोदी फोटो काढण्यात दंग- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 17:05 IST

मेघालयमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून कोळशाच्या खाणीत 15 खनिकर्मचारी अडकले आहेत.

ठळक मुद्देमेघालयमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून कोळशाच्या खाणीत 15 खनिकर्मचारी अडकले आहेत.अद्यापही त्यांना खाणीतून बाहेर काढण्यात यश मिळालेलं नाही. त्या कोळशाच्या खाणीत अडकून पडलेल्या खनिकर्मचाऱ्यांना वाचवण्याची मागणी राहुल गांधींनी मोदींकडे केली आहे.

शिलाँग- मेघालयमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून कोळशाच्या खाणीत 15 खनिकर्मचारी अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी अभियान राबवलं जातंय. परंतु अद्यापही त्यांना खाणीतून बाहेर काढण्यात यश मिळालेलं नाही. याच मुद्द्याचा आधार घेत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे. तसेच त्या कोळशाच्या खाणीत अडकून पडलेल्या खनिकर्मचाऱ्यांना वाचवण्याची मागणी राहुल गांधींनी मोदींकडे केली आहे.13 डिसेंबर रोज मेघालयातील एका कोळशाच्या खाणी 15 खनिकर्मचारी अडकून पडले आहेत. राहुल गांधींनी केंद्र सरकारवरही गंभीर आरोप केले आहेत. केंद्र सरकारनं त्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी हाय प्रेशर पंपाची व्यवस्था करण्यास नकार दिला आहे. पंतप्रधानांनी या खनिकर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न केले पाहिजेत. राहुल गांधी ट्विट करत म्हणाले, पाण्यानं भरलेल्या कोळशाच्या खाणीत गेल्या आठवड्यात 15 खनिकर्मचारी अडकले आहेत. त्यांना त्या खाणीत श्वास घेण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोगीबील सेतूवर कॅमेऱ्यांसमोर पोज देत फिरत आहेत. त्यांच्या सरकारनं त्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी हाय प्रेशर पंप देण्यास नकार दिला आहे.तत्पूर्वी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही मोदींवर टीका केली होती. 11 दिवस 15 खनिकर्मचारी मेघालयात अडकून पडले आहेत. खाणीतून पाणी काढण्याचं काम जलदगतीनं केलं पाहिजे. एक एक मिनिट महत्त्वपूर्ण आहे. मोदी सरकारकडूनही उशिरानं यावर प्रतिक्रिया येत आहे. त्या खनिकर्मचाऱ्यांचा जीव वाचावा, यासाठी मी प्रार्थना करत असल्याचंही सुरजेवाला म्हणाले आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी