शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

पाटण्यात चेंगराचेंगरी

By admin | Updated: October 4, 2014 03:01 IST

पाटणा येथील गांधी मैदानावर दसरा महोत्सवाचा कार्यक्रम संपल्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 32 जण ठार, तर अनेक जखमी झाले आहेत.

दस:याला गालबोट : गांधी मैदानावर रावण वधाच्या कार्यक्रमानंतर दुर्घटना
पाटणा : पाटणा येथील गांधी मैदानावर दसरा महोत्सवाचा कार्यक्रम संपल्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 32 जण ठार, तर अनेक  जखमी झाले आहेत.  मृतांत महिला व मुलांची संख्या अधिक आहे. 
रावण वधाचा कार्यक्रम पाहून लोक परतत असताना ही दुर्घटना घडली. पाटणा येथील गांधी मैदानावर ‘रावण वध’ पाहण्यास मोठा जमाव जमला होता. लोक जास्त असल्याने चेंगराचेंगरी झाली, त्यात 32 लोक ठार झाल्याचे बिहारचे गृहसचिव अमीर सुभानी यांनी सांगितले. मृतांत 2क् महिला व 5-6 मुलांचा समावेश असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या दुर्घटनेत 15 जण जखमी झाले असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार चालू आहेत.  
रावणाचा 6क् फूट उंच पुतळा उभारला होता. दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी दरवर्षी 5क् हजाराहून अधिक लोक जमतात. हा कार्यक्रम पाहण्यास बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी गांधी मैदानावर उपस्थित होते. राज्यातील संयुक्त जनता दलाचे प्रमुख शरद यादव यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. 
 
च्पाटना शहरातील गांधी मैदानावरील रस्त्यावरून पुढे जाण्यास रेटारेटी सुरु होती. 
च्त्याचवेळी विद्यूत प्रवाह सुरु असलेली वीजेची तार जमिनीवर पडल्याची अफवा पसरली. 
च्त्यामुळे घबराट पसरली आणि चेंगराचेंगरीची घटना घडली.
 
2 लाखाची मदत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून यातील मृत व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकास 2 लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून गंभीररित्या जखमी झालेल्यांसाठी 5क् हजार रुपयांची मदत दिली जाईल.  
 
सोनिया गांधींकडून सांत्वन 
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दुर्घटनेतील जिवितहानीमुळे धक्काच बसला असे म्हटले असून, दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
 
पासवानांचे राजकारण
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत हा अपघात टाळण्यासाठी राज्य सरकारने ठोस उपाययोजना केल्या नसल्याचा अरोप केला. बिहारमध्ये छट पुजेच्यावेळी चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या होत्या. मात्र, राज्य सरकारने यापासून योग्य तो धडा घेतला नसल्याचा दावा पासवान यांनी केला.