शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Assam NRC Draft: काहीजणांकडून परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न- राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 13:29 IST

कोणासोबतही भेदभाव केला जाणार नाही, अशी ग्वाही राजनाथ सिंह यांनी दिली

नवी दिल्ली : आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन लागू करण्यात आल्यानंतर राजकीय वादंग माजला आहे. यावरुन आज केंद्र सरकारनं संसदेत आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. एनआरसीचा अंतिम मसुदा आसाम करारानुसार तयार करण्यात आला असून या माध्यमातून कोणासोबतही भेदभाव केला जाणार नाही, अशी हमी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एनआरसीचा अंतिम मसुदा तयार करण्यात आला आहे. ज्या लोकांची नावं यामध्ये नाहीत, त्यांना त्यांचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पुन्हा संधी दिली जाईल, असं राजनाथ सिंह राज्यसभेत म्हणाले. या मुद्यावरुन मुद्दाम वातावरण तापवून परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप त्यांनी विरोधकांवर केला. 'एनआरसीचा अंतिम मसुदा जारी करण्यात आलेला आहे. तो अंतिम एनआरसी नाही. 24 मार्च 1971 च्या आधीपासून राज्यात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या नावाचा समावेश यामध्ये आहे. ज्या व्यक्तींकडे जमिनीची कागदपत्रं, पासपोर्ट, विमा पॉलिसी आहेत, त्यांच्या नावांचा समावेशदेखील एनआरसीमध्ये करण्यात आला आहे. 1971 च्या आधीपासून देशात राहणाऱ्या आणि नंतर आसाममध्ये स्थायिक झालेल्या लोकांनी त्यांच्याकडे असणारी दुसऱ्या राज्यांमधील कागदपत्रं प्रशासनाला द्यावीत,' असं सिंह म्हणाले. आसाम कराराची प्रक्रिया 1985 मध्ये राजीव गांधी पंतप्रधान असताना सुरू झाली होती. यानंतर एनआरसी अद्ययावत करण्याचा निर्णय 2005 मध्ये मनमोहन सिंग सरकारच्या काळात घेण्यात आला, असं सिंह यांनी राज्यसभेत सांगितलं. एनआरसीचा अंतिम मसुदा तयार करण्याची प्रक्रिया पारदर्शक आहे आणि त्यामध्ये कोणासोबतही भेदभाव करण्यात आलेला नाही, असं ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली नागरिकत्व सिद्ध करणाऱ्या सर्व व्यक्तींचा समावेश एनआरसीमध्ये करण्यात येईल, अशी हमीदेखील त्यांनी दिली. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी