शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

...म्हणून नष्ट झाले मंगळावरील वातावरण; साैर वारे कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 2:35 AM

शास्त्रज्ञांच्या या दाव्यामुळे जुन्याच सिद्धांताला बळ मिळते.

नवी दिल्ली : साैरमंडळातील लाल ग्रह अर्थात मंगळाबाबत मानवाला कायम कुतूहल राहिले आहे. अलीकडच्या काळात भारत, चीन, अमेरिका, युएई इत्यादी देशांनी या ग्रहावर यान पाठविले आहेत. अमेरिकेच्या ‘पर्सिव्हरन्स राेव्हर’ यानाने तीन दिवसांपूर्वीच मंगळावर सुरक्षित लॅँडिंग केले. आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या माेहिमांमधून काही प्रमाणात माहिती मिळाली आहे. मंगळावरील वातावरण कशामुळे नष्ट झाले, या प्रश्नावर ठाेस उत्तर मिळाले नाही. मात्र, शास्त्रज्ञांनी याचे एक संभाव्य कारण शाेधले आहे. साैर वाऱ्यांमुळे मंगळावरील वातावरण नष्ट झाले असावे आणि त्यासाठी मंगळावर चुंबकीय क्षेत्राचे अस्तित्व नसणे, हे कारण राहण्याची दाट शक्यता वर्तविली आहे.

शास्त्रज्ञांच्या या दाव्यामुळे जुन्याच सिद्धांताला बळ मिळते. जीवन कायम राहण्यासाठी हानिकारक साैर वाऱ्यांना राेखण्यासाठी रक्षात्मक चुंबकीय क्षेत्र आवश्यक असते. हे एक प्रकारचे अदृश्य कवच आहे. पृथ्वीवर भू-विद्युत तंत्र अशा प्रकारचे रक्षात्मक आवरण तयार करते. त्यामुळेच पृथ्वीवरील वातावरणाचे रक्षण हाेते. मंगळावर असे क्षेत्र नाही. परिणामी साैर वाऱ्यांमुळे तेथील वातावरण नष्ट झाले असावे. भारतीय विज्ञान शिक्षा व संशाेधन संस्थेचे शास्त्रज्ञ अर्णब बासक आणि दिब्येन्दू नंदी म्हणाले, चुंबकीय क्षेत्र संरक्षण छत्रीप्रमाणे कार्य करतात. 

दुर्लक्षित मुद्दा

विज्ञान पत्रिका ‘मंथली नाेटिसेज ऑफ राॅयल ॲस्ट्राॅनाॅमिकल साेसायटी’मध्ये याबाबत संशाेधन अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. ग्रहांच्या स्वत:च्या अवतीभवती चुंबकीय क्षेत्र निर्माण करण्याच्या क्षमतेकडे आतापर्यंत दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे.  

आकर्षण मंगळाचे

भारत-मंगलयान २४ सप्टेंबरपासून मंगळाच्या ऑर्बिटमधून माहिती पाठवीत आहे.अमेरिका-पर्सिव्हरन्स राेव्हर मंगळावर लँड झाले.चीन- ‘टियान्वेन-१’ मंगळाच्या ऑर्बिटमध्ये दाखल झाले आहे.युएई- ‘द हाेप ऑर्बिटर’ मंगळाच्या ऑर्बिटमध्ये दाखल झाले आहे.

 

टॅग्स :Indiaभारत