शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

तिकिटासाठी शिवसेनेत शह-काटशह

By admin | Updated: September 23, 2014 00:30 IST

कळवा-मुंब्य्रात आव्हाडांना घेरण्याच्या नादात आता शिवसेनेकडून या मतदारसंघात काँग्रेसमधील इच्छुकाने मुलाखत दिली आहे

ठाणे : कळवा-मुंब्य्रात आव्हाडांना घेरण्याच्या नादात आता शिवसेनेकडून या मतदारसंघात काँग्रेसमधील इच्छुकाने मुलाखत दिली आहे. दुसरीकडे ठाणे शहर मतदारसंघात नरेश म्हस्के आणि रवींद्र फाटक यांच्यात तिकिटावरून दोन गट तयार झाले आहेत. त्यात ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरदेखील आरोपांच्या फैरी झडू लागल्याने या तीन मतदारसंघांत आता शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे.कळवा - मुंब्रा मतदारसंघात राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्यात घरात घेरण्यासाठी सर्वपक्षीय नेते मंडळी एकत्र आले असून त्या दृष्टीने शिवसेनेने व्यूहरचनादेखील आखली आहे. त्यानुसार, मुलाखतीच्या वेळेस राष्ट्रवादीतून शिवसेनेत डेरेदाखल झालेले दशरथ पाटील आणि सुधीर भगत यांनी मुलाखती दिल्या आहेत. विशेष म्हणजे पाटील यांना शिवसेनेत आणण्यासाठी त्यांना सुरुवातीलाच कमिटमेंट दिली गेली होती. परंतु, आता शिवसेनेनेच ही कमिटमेंट तोडण्याचा घाट घातला आहे. वारंवार पक्ष बदलणाऱ्या काँग्रेसचे राजन किणे यांनी येथील जागेसाठी शिवसेनेतून मुलाखत दिल्याने पाटलांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. विशेष म्हणजे यामुळे येथील स्थानिक शिवसैनिक चांगलेच धास्तावले आहेत. परंतु, आता त्याचे परिणाम शिवसेनेला येथे भोगावे लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यामुळे आव्हाडांना येथे घेरण्याच्या नादात शिवसेनेत किणे यांच्या निमित्ताने ठिणगी पडल्याचे चित्र आहे.दुसरीकडे ठाणे शहर मतदारसंघातही ९ जण रेसमध्ये असले तरीदेखील तिकीट मिळवण्याची खरी रेस ही सभागृह नेते नरेश म्हस्के आणि काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले रवींद्र फाटक यांच्यात असू शकते. फाटकांना तिकीट दिले तर निष्ठावान शिवसैनिकांनी त्यांचा प्रचार न करण्याचे जवळजवळ निश्चित केले आहे. तसेच अशोक वैती, अनंत तरे, गोपाळ लांडगे हेदेखील येथूनतिकीट मिळवण्याच्या रेसमध्ये आहेत. त्यामुळे येथे देखील आता फाटकविरोधी वातावरण निर्माण झाले असून निष्ठावान विरुद्ध फाटक असा काहीसा सामना येथे तिकीट मिळण्यापूर्वीच रंगला आहे. त्यामुळे कोणाच्या पारड्यात तिकीट पडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ओवळा-माजिवडा मतदारसंघातही आता प्रताप सरनाईक यांच्या विरोधातील सूर वाढल्याचे चित्र आहे. मुलाखतीसाठी गेलेल्या सरनाईक यांच्यावर आता आरोप केले जात असून राष्ट्रवादी सोडून ते शिवसेनेत जरी डेरेदाखल झाले असले तरी ते आजही एकनिष्ठ नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. परंतु, यामागे वेगळेच राजकारण शिजत असल्याचा आरोप सरनाईकांच्या निकटवर्तीयांनी केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. (प्रतिनिधी)