शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 19:50 IST

Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj: मराठी अस्मिता ही वेगळी गोष्ट आहे. हिंदी भाषेला रोखणे किंवा मराठीला प्रोत्साहन देणे हा त्यांचा मुद्दाच नाही. राजकारणासाठी हे सगळे केले जात आहे, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले आहे.

Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj: मराठी असेल किंवा हिंदी असेल, सगळ्या भारताच्याच भाषा आहेत. मराठी किंवा हिंदी भारतातील भाषांवर भारतवासी प्रेम करतो. केवळ बंगालमधील लोक म्हणाले की, आमचेच बंगाली भाषेवर प्रेम आहे. गुजरातचे लोक म्हणाले की, आमचेच गुजराती भाषेवर प्रेम आहे. महाराष्ट्राचे लोक म्हणाले की, आमचेच मराठीवर प्रेम आहे, तर असे म्हणून चालणार नाही. कारण संपूर्ण देशाचे या सगळ्या भाषांवर प्रेम आहे, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी स्पष्ट केले.

आम्ही तसेच देशातील सगळेच सण सर्व भाषांचा आदर करतात, प्रेम करतात. आम्हाला मराठी भाषा येत नसली, तरी ती यावी, ती शिकावी, यासाठी आम्ही प्रयत्न करू. महाराष्ट्राला मोठी संत परंपरा आहे. अनेक मोठे संत महाराष्ट्रात होऊन गेले. त्यांनी त्यांची शिकवण, ज्ञान मराठी भाषेतून दिले आहे. वारकरी संप्रदायाचे अभंग असतील, संतवाणी असेल, ज्ञानेश्वरी असेल किंवा संतांचे कोणतेही ग्रंथ असतील, हे सगळे मराठी भाषेत आहेत. संतांनी दिलेले ज्ञान आणि शिकवण आत्मसाद करण्यासाठी मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न असेल. आम्ही महाराष्ट्रातील नसलो, तरी आम्हाला मराठीबाबत प्रेम आहे, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी नमूद केले.

ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? 

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू तब्बल २० वर्षांनंतर वरळी डोममधील मराठी विजय मेळाव्यात एकत्र आले. आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही किंवा तशी घोषणा करण्यात आलेली नाही. ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत, मनसे-ठाकरे गटाच्या युतीबाबत शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. यावर बोलताना, यासंदर्भात वैयक्तिक भाष्य करणे योग्य वाटत नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा हा मेळ अमेळ आहे. तो जास्त काळ टिकणार नाही. तसेच त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही. राज ठाकरे यांची राजकारण करण्याची शैली वेगळी आहे आणि उद्धव ठाकरे यांची राजकारण करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले तरीही ते किती काळ टिकतील? जास्त काळ टिकू शकत नाही. राज ठाकरे एका समाजाला पुढे घेऊन जातात आणि आपली मते ठामपणे, स्पष्टपणे मांडतात. दुसरीकडे उद्धव ठाकरे समावेशी विचारांचे झाले आहेत, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, हिंदी भाषेला रोखणे किंवा मराठीला प्रोत्साहन देणे हा त्यांचा मुद्दाच नाही. राजकारणासाठी हे सगळे केले जात आहे. राजकारणासाठी तुम्ही जे काही करत आहात, ते स्पष्टपणे दिसत आहे. मराठी अस्मिता ही वेगळी गोष्ट आहे. तुम्ही हिंदीत का बोलता, कारण संपूर्ण देशाशी तुम्हाला संपर्क, संवाद साधायचा आहे. तुम्ही इंग्रजी भाषेचे समर्थन का करता? हिंदीचा विरोध करत आहात, इंग्रजीचे समर्थन करत आहात, असे का करता तुम्ही? आमच्या मुलांना इंग्रजी यायला हवे, कारण ती जगाची संपर्क भाषा आहे, असे तुम्हाला वाटत असेल, तर हिंदी भाषेतून देशाशी संपर्क, संवाद साधायला तुमचा विरोध का? भारताच्या अनेक राज्यांमध्ये हिंदी बोलली जाते. हिंदी देशाची राष्ट्रभाषा नसली, तरी राजभाषा आहे. सगळ्या राज्यांना आपापल्या भाषांमधून व्यवहार करण्याची मुभा आहे. महाराष्ट्रात विधिमंडळापासून ते शासन, प्रशासनापर्यंत मराठीतून व्यवहार होतो, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले आहे. ते टीव्ही९शी बोलत होते.

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रmarathiमराठीhindiहिंदीRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण