शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 19:50 IST

Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj: मराठी अस्मिता ही वेगळी गोष्ट आहे. हिंदी भाषेला रोखणे किंवा मराठीला प्रोत्साहन देणे हा त्यांचा मुद्दाच नाही. राजकारणासाठी हे सगळे केले जात आहे, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले आहे.

Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj: मराठी असेल किंवा हिंदी असेल, सगळ्या भारताच्याच भाषा आहेत. मराठी किंवा हिंदी भारतातील भाषांवर भारतवासी प्रेम करतो. केवळ बंगालमधील लोक म्हणाले की, आमचेच बंगाली भाषेवर प्रेम आहे. गुजरातचे लोक म्हणाले की, आमचेच गुजराती भाषेवर प्रेम आहे. महाराष्ट्राचे लोक म्हणाले की, आमचेच मराठीवर प्रेम आहे, तर असे म्हणून चालणार नाही. कारण संपूर्ण देशाचे या सगळ्या भाषांवर प्रेम आहे, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी स्पष्ट केले.

आम्ही तसेच देशातील सगळेच सण सर्व भाषांचा आदर करतात, प्रेम करतात. आम्हाला मराठी भाषा येत नसली, तरी ती यावी, ती शिकावी, यासाठी आम्ही प्रयत्न करू. महाराष्ट्राला मोठी संत परंपरा आहे. अनेक मोठे संत महाराष्ट्रात होऊन गेले. त्यांनी त्यांची शिकवण, ज्ञान मराठी भाषेतून दिले आहे. वारकरी संप्रदायाचे अभंग असतील, संतवाणी असेल, ज्ञानेश्वरी असेल किंवा संतांचे कोणतेही ग्रंथ असतील, हे सगळे मराठी भाषेत आहेत. संतांनी दिलेले ज्ञान आणि शिकवण आत्मसाद करण्यासाठी मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न असेल. आम्ही महाराष्ट्रातील नसलो, तरी आम्हाला मराठीबाबत प्रेम आहे, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी नमूद केले.

ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? 

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू तब्बल २० वर्षांनंतर वरळी डोममधील मराठी विजय मेळाव्यात एकत्र आले. आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही किंवा तशी घोषणा करण्यात आलेली नाही. ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत, मनसे-ठाकरे गटाच्या युतीबाबत शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. यावर बोलताना, यासंदर्भात वैयक्तिक भाष्य करणे योग्य वाटत नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा हा मेळ अमेळ आहे. तो जास्त काळ टिकणार नाही. तसेच त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही. राज ठाकरे यांची राजकारण करण्याची शैली वेगळी आहे आणि उद्धव ठाकरे यांची राजकारण करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले तरीही ते किती काळ टिकतील? जास्त काळ टिकू शकत नाही. राज ठाकरे एका समाजाला पुढे घेऊन जातात आणि आपली मते ठामपणे, स्पष्टपणे मांडतात. दुसरीकडे उद्धव ठाकरे समावेशी विचारांचे झाले आहेत, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, हिंदी भाषेला रोखणे किंवा मराठीला प्रोत्साहन देणे हा त्यांचा मुद्दाच नाही. राजकारणासाठी हे सगळे केले जात आहे. राजकारणासाठी तुम्ही जे काही करत आहात, ते स्पष्टपणे दिसत आहे. मराठी अस्मिता ही वेगळी गोष्ट आहे. तुम्ही हिंदीत का बोलता, कारण संपूर्ण देशाशी तुम्हाला संपर्क, संवाद साधायचा आहे. तुम्ही इंग्रजी भाषेचे समर्थन का करता? हिंदीचा विरोध करत आहात, इंग्रजीचे समर्थन करत आहात, असे का करता तुम्ही? आमच्या मुलांना इंग्रजी यायला हवे, कारण ती जगाची संपर्क भाषा आहे, असे तुम्हाला वाटत असेल, तर हिंदी भाषेतून देशाशी संपर्क, संवाद साधायला तुमचा विरोध का? भारताच्या अनेक राज्यांमध्ये हिंदी बोलली जाते. हिंदी देशाची राष्ट्रभाषा नसली, तरी राजभाषा आहे. सगळ्या राज्यांना आपापल्या भाषांमधून व्यवहार करण्याची मुभा आहे. महाराष्ट्रात विधिमंडळापासून ते शासन, प्रशासनापर्यंत मराठीतून व्यवहार होतो, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले आहे. ते टीव्ही९शी बोलत होते.

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रmarathiमराठीhindiहिंदीRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण