शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

'...तर 15 वर्षांत पूर्ण होईल अखंड भारताचं स्वप्न, जे याच्या मार्गात येतील ते नष्ट होतील' - मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 14:07 IST

"आम्ही अहिंसेसंदर्भात बोलू, पण हातात दंडही ठेऊ, कारण हे जग शक्तीपुढेच नतमस्तक होते," असेही भागवत यांनी म्हटले आहे.

अखंड भारत हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाचा सर्वात महत्वाचा आणि मोठा अजेंडा राहिला आहे. आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी यासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. तसे तर, येणाऱ्या 20 ते 25 वर्षांत भारत अखंड भारत होईल. पण आपण थोडे प्रयत्न केले, तर स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंद यांच्या स्वप्नातील अखंड भारत 10 ते 15 वर्षांतच साकार होईल. याला रोखणारं कुणीही नाही. जे याच्या मार्गात येतील ते नष्ट होतील. एवढेच नाही, तर सनातन धर्मच हिंदू राष्ट्र आहे, असेही मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ते हरिद्वार येथे बोलत होते. 

भागवत म्हणाले, ज्या पद्धतीने भगवान श्रीकृषांच्या करंगळीने गोवर्धन पर्वत उचललागेला. त्याच प्रकारे, संत मंडळींच्या आशीर्वादाने भारत लवकरच पुन्हा एकदा अखंड भारत होईल. भारत उत्थानाच्या पटरीवर पुढे जात आहे. याच्या मार्गात जे येतील ते नष्ट होतील. आता भारत उत्थानाशिवाय थांबणार नाही. भारत उत्थानाच्या पटरीवर धावत आहे. तो शिटी वाजवत, उत्थानाच्या या प्रवासात सर्वांनी सोबत यावे, थांबवण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, जे कुणी थांबवण्याचा प्रयत्न करणारे आहेत, त्यांनीही सोबत यावे आणि ज्यांना सोबत यायचे नसेल त्यांनी मार्गातून बाजूला व्हावे, असे म्हणत आहे.

आपण एक होऊन देशासाठी जगायला आणि मरायलाही शिकायला हवे - भागवत म्हाणाले, आपण वेगवेगळे नाही. जर आपण एक होऊन देशासाठी जगायला आणि मरायला सुरुवात केली, तर  मी विश्वासाने सांगू शकतो, की ज्या गतीने भारत उत्थानाच्या दिशेने वाटचाल करत आहे, भारत अखंड होण्यासाठी केवळ 20 ते 25 वर्षांचाच कालावधी लागेल. आणि जर आपण आपला वेग वाढविला, तर हा काळ अर्ध्यावर येईल आणि असेच व्हायला हवे. एवढेच नाही, तर आम्ही अहिंसेसंदर्भात बोलू, पण हातात दंडही ठेऊ, कारण हे जग शक्तीपुढेच नतमस्तक होते, असेही ते म्हणाले.

मोहन भगवत हरिद्वारमधील कनखलच्या संन्यास रोड येथील श्री कृष्ण निवास आश्रम आणि पूर्णानद आश्रमात ब्रह्मलीन महामंडलेश्वर स्वामी दिव्यानंद गिरी महाराजांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आणि  गुरुत्रय मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतIndiaभारतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ