शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

'...तर 15 वर्षांत पूर्ण होईल अखंड भारताचं स्वप्न, जे याच्या मार्गात येतील ते नष्ट होतील' - मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 14:07 IST

"आम्ही अहिंसेसंदर्भात बोलू, पण हातात दंडही ठेऊ, कारण हे जग शक्तीपुढेच नतमस्तक होते," असेही भागवत यांनी म्हटले आहे.

अखंड भारत हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाचा सर्वात महत्वाचा आणि मोठा अजेंडा राहिला आहे. आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी यासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. तसे तर, येणाऱ्या 20 ते 25 वर्षांत भारत अखंड भारत होईल. पण आपण थोडे प्रयत्न केले, तर स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंद यांच्या स्वप्नातील अखंड भारत 10 ते 15 वर्षांतच साकार होईल. याला रोखणारं कुणीही नाही. जे याच्या मार्गात येतील ते नष्ट होतील. एवढेच नाही, तर सनातन धर्मच हिंदू राष्ट्र आहे, असेही मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ते हरिद्वार येथे बोलत होते. 

भागवत म्हणाले, ज्या पद्धतीने भगवान श्रीकृषांच्या करंगळीने गोवर्धन पर्वत उचललागेला. त्याच प्रकारे, संत मंडळींच्या आशीर्वादाने भारत लवकरच पुन्हा एकदा अखंड भारत होईल. भारत उत्थानाच्या पटरीवर पुढे जात आहे. याच्या मार्गात जे येतील ते नष्ट होतील. आता भारत उत्थानाशिवाय थांबणार नाही. भारत उत्थानाच्या पटरीवर धावत आहे. तो शिटी वाजवत, उत्थानाच्या या प्रवासात सर्वांनी सोबत यावे, थांबवण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, जे कुणी थांबवण्याचा प्रयत्न करणारे आहेत, त्यांनीही सोबत यावे आणि ज्यांना सोबत यायचे नसेल त्यांनी मार्गातून बाजूला व्हावे, असे म्हणत आहे.

आपण एक होऊन देशासाठी जगायला आणि मरायलाही शिकायला हवे - भागवत म्हाणाले, आपण वेगवेगळे नाही. जर आपण एक होऊन देशासाठी जगायला आणि मरायला सुरुवात केली, तर  मी विश्वासाने सांगू शकतो, की ज्या गतीने भारत उत्थानाच्या दिशेने वाटचाल करत आहे, भारत अखंड होण्यासाठी केवळ 20 ते 25 वर्षांचाच कालावधी लागेल. आणि जर आपण आपला वेग वाढविला, तर हा काळ अर्ध्यावर येईल आणि असेच व्हायला हवे. एवढेच नाही, तर आम्ही अहिंसेसंदर्भात बोलू, पण हातात दंडही ठेऊ, कारण हे जग शक्तीपुढेच नतमस्तक होते, असेही ते म्हणाले.

मोहन भगवत हरिद्वारमधील कनखलच्या संन्यास रोड येथील श्री कृष्ण निवास आश्रम आणि पूर्णानद आश्रमात ब्रह्मलीन महामंडलेश्वर स्वामी दिव्यानंद गिरी महाराजांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आणि  गुरुत्रय मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतIndiaभारतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ