शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

हिंदीबाबत काँग्रेसची भूमिका सहकारी पक्षांनाही सांगावी; भाजपाने केलं काँग्रेसला ट्रोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 11:09 IST

केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी ट्विट करत हिंदी भाषेवरुन काँग्रेसला टोला लगावला आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंदी दिनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या विधानावरुन राजकीय वातावरण पेटू लागलं आहे. दक्षिणेतील अनेक नेत्यांनी शहांच्या वक्तव्याचा निषेध केला असून कर्नाटकातील भाजपा नेत्यांनीही कन्नड भाषेच्या रक्षणासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं आहे. 

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही ट्विट करत अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध केला. कन्नड, उडिया, मराठी, हिंदी, तामिळ, इंग्रजी, गुजराती, बांग्ला, उर्दू, पंजाबी, कोंकणी यासारख्या विविध भाषा असणे हा आपला कमकुवतपणा नाही असं अमित शहांना सांगितले आहे. मात्र यावरुन काँग्रेस आणि भाजपात ट्विटर वॉर सुरु झालं आहे. 

केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी ट्विट करत हिंदी भाषेवरुन काँग्रेसला टोला लगावला आहे. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या भाषणाचा व्हिडीओ पोस्ट करत हिंदी भाषेबाबत काँग्रेसची भूमिका त्यांच्या सहकारी पक्षांनाही सांगावी असं सांगितले आहे. किरण रिजिजू यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओत पी. चिदंबरम हिंदी दिनाच्या कार्यक्रमात बोलताना म्हणत आहेत की, मी अपेक्षा करतो, आपली राजभाषा हिंदी पूर्ण देशात विकसित करण्यासाठी आम्ही संपूर्णपणे प्रयत्नशील आहोत. हा व्हिडीओ 14 सप्टेंबर 2010 चा आहे. 

अमित शहांच्या वक्तव्यावर बी.एस येदियुरप्पा यांनीही ट्विट करत सांगितले आहे की, देशात सर्व भाषा एकसमान आहेत. कर्नाटकात कन्नड ही प्रमुख भाषा आहे. आम्ही कधीच कन्नड भाषेसोबत तडझोड करणार नाही. कन्नड भाषा आणि संस्कृतीला चालना देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असं त्यांनी सांगितले आहे. 

तर दाक्षिणात्य अभिनेते आणि राजकीय नेते कमल हासन यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला करुन अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. देशात एक भाषा लादली जाऊ शकत नाही, असे झाल्यास मोठे आंदोलन होईल. ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत कमल हासन म्हणाले, "1950 मध्ये भारत प्रजासत्ताक झाला, त्यावेळी वचन दिले होते की प्रत्येक क्षेत्रातील भाषा आणि संस्कृतीचा सन्मान केला जाईल आणि त्याला सुरक्षित ठेवले जाईल. त्यामुळे कोणताही शाह, सुल्तान  किंवा सम्राट हे वचन अचानक तोडू शकत नाही. अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या देशाच्या एकतेसाठी त्याग केला आहे. मात्र, लोक आपली भाषा, संस्कृती आणि ओळख विसरू शकत नाहीत असं त्यांनी सांगितले होते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसAmit Shahअमित शहा