शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

गटा- तटात विभागला रिपब्लिकन पक्ष काँग्रेससोबत फारकत : आंबेडकरी कार्यकर्ते भाजपच्या तंबूत

By admin | Updated: February 15, 2017 21:22 IST

आंबेडकरी कार्यकर्ते भाजपच्या तंबूत

अमरावती: महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये रिंगणात उमेदवारांची यादी बघितली तर रिपब्लिकन पक्ष हा गटा- तटात विखुरल्याचे दिसून येते. मात्र, काँग्रेसशी परंपरागत मैत्री असलेला रिपब्लिकन पक्ष (गवई गट) स्वबळावर निवडणूक लढवित आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाने भाजपशी राज्यात मैत्री केली आहे. मात्र, भाजपसोबत अमरावतीत रिपाइंची मैत्री नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीत रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाने स्वतंत्र उमेदवार उभे केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका जाहीर होताच काँग्रेस- राष्ट्रवादी व भाजप- शिवसेना अशी आघाडी, युती होईल, असा राजकीय तज्ञ्जांचा अंदाज होता. परंतु युती, आघाडीत बिघाडी झाल्याने ‘एकला चलो रे’चा नारा देण्यात आला. निवडणुकीत भाजप व काँग्रेसची रिपब्लिकन पक्षासोबत मैत्री होईल, असे संकेत होते. परंतु जागा वाटपाचा तिढा सोडविण्यात काँग्रेस, भाजपच्या नेत्यांना अपयश आले. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाने ‘जोर आजमाईस’ म्हणून उमेदवार रिंगणात आहेत. तर दुसरीकडे बसपाने देखील महापालिकेत ३६ उमेदवार रिंगणात आहेत. दलित उमेदवार व्यतिरिक्त अन्य समाजाच्या प्रतिनिधींना तिकिट देवून बसपाने सोशल इंजिनिअरींगचा प्रयोग केला आहे. यापूर्वी महापालिकेत बसपाचे सहा नगरसेवक होते. तथापि, गुंफाबाई मेश्राम वगळता कोणालाही पुन्हा बसपाने उमेदवारी दिली नाही. तिकिट नाकारल्याने बहुतांश बसपाचे नगरसेवक रिपब्लिकन पक्ष, काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीच्या बॅनरवर निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे बंडखोरीचा फटका बसपाला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महापालिकेत ८७ जागांसाठी ६२४ उमेदवार रिंगणात आहेत. अनुसूचित जातीच्या आरक्षित जागांवर रिपब्लिकन पक्षाचा जोर आहे. परंतु आरक्षित जागेवर उमेदवारांची संख्या बघता रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार विजयी होणार की नाही? हा चिंतनाचा विषय आहे. रामदास आठवले, राजेंद्र गवई यांचा रिपब्लिकन पक्ष, आ. जोगेंद्र कवाडे यांचा पिपल्स रिपब्लिकन पार्टी तर प्रकाश आंबेडकरांचा भारिप- बमसं आदी रिपब्लिकन पक्ष गटा- तटात विखरून निवडणूक लढवित आहेत. ‘हम किसी से कम नही’ असे म्हणत रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी राजकीय शक्ती पणाला लावली आहे. मात्र महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निकालानंतर किती यश येईल, हे तेव्हाच स्पष्ट होईल. रिपब्लिकन नेत्यांनी स्वबळावर उमेदवार उभे करुन आपली राजकीय शक्ती तपासून पाहणार आहेत.आंबेडकरी कार्यकर्ते भाजपचे उमेदवार४रिपब्लिकन पक्षात आंबेडकरी विचारधारेवर अनेक वर्षे राजकीय प्रवास करणाऱ्या कार्यकर्त्यांनी यावेळी महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपची उमेदवारी घेतली आहे. आंबेडकरी कार्यकर्ते कमळ चिन्हावर निवडणूक लढवित असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता दलित वस्त्यांमध्ये रिपब्लिकन पक्षासोबत भाजपचे चिन्ह घराघरात पोहचेल, हे विशेष.