शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

गाझीपूर बॉर्डरवर मोठ्या संख्येने पोलीस तैनात; ...तर आत्महत्या करीन; राकेश टिकैत यांची सरकारला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 7:40 PM

आपण पोलिसांच्या स्वाधीन होणार होतो. मात्र, भाजप आमदारांनी आमच्या लोकांसोबत मारहाण केली आहे. आमच्या लोकांना रस्त्यात मारहाण करण्याची योजना आहे. त्यामुळे आता आम्ही येथून जाणार नाही. आम्ही येथेच बसणार.

नवी दिल्ली -शेतकरी आंदोलनातील नेते राकेश टिकैत यांनी आता आत्महत्येची धमी दिली आहे. माध्यमांसोबत बोलताना ते रडत म्हणाले, जर तीनही कृषी कायदे मागे घेतले नाही, तर मी आत्महत्या करीन. मला काही झाले, तर त्याला प्रशासन जबाबदार असेल. एवढेच नाही, तर मी शेतकऱ्यांना बर्बाद होऊ देणार नाही. शेतकऱ्यांना मारण्याचे शडयंत्र होत आहे. हा अत्याचार होत आहे.

प्रशासन आणि टिकैत यांची चर्चा फेल - गाझीपूर बॉर्डरवर प्रशासन आणि राकेश टिकैत यांच्यातील चर्चा फेल झाली आहे. यानंतर राकेश टिकैत यांनी आरोप केला आहे, की भाजप आमदार पोलिसांसोबत आले आहेत. आता यांची दादागिरी चालणार नाही.

भाजपवर राकेश टिकैत यांचा मोठा आरोप -गाझीपूर बॉर्डरवर राकेश टिकैत म्हणाले, आपण पोलिसांच्या स्वाधीन होणार होतो. मात्र, भाजप आमदारांनी आमच्या लोकांसोबत मारहाण केली आहे. आमच्या लोकांना रस्त्यात मारहाण करण्याची योजना आहे. त्यामुळे आता आम्ही येथून जाणार नाही. आम्ही येथेच बसणार.

गाझीपूर बॉर्डरला छावणीचं स्वरूप -गाझीपूर बॉर्डरवर सध्या मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. प्रशासनाचे चमूही आंदोलन स्थळावर उपस्थित आहेत. याशिवाय स्थानिक लोकही येथे जमले असून त्यांनी रस्ता खुला करण्याची मागणी केली आहे.

दिल्ली पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये -ट्रॅक्टर मोर्चावेळी झालेल्या हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्यांची धरपकड करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. अनेक शेतकरी नेत्यांविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. या नेत्यांचे पासपोर्ट जप्त करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. घालून दिलेल्या अटी-शर्तींचं पालन न केल्यानं तुमच्याविरुद्ध कारवाई का करू नये, असा सवाल पोलिसांकडून शेतकरी नेत्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी नेत्यांना ३ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. 

दिल्ली पोलीसही अ‍ॅक्शन मोडमध्ये -आंदोलक शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला ट्रॅक्टर मोर्चा काढला. या मोर्चावेळी अनेक ठिकाणी आंदोलक शेतकरी आणि पोलीस आमनेसामने आले. बऱ्याच भागांमध्ये हिंसाचार झाला. आंदोलकांनी लाल किल्ल्यात घुसून धर्मध्वज लावला. या हिंसाचारात 300 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले. यानंतर आता दिल्ली पोलीसही अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. ट्रॅक्टर मोर्चावेळी झालेल्या हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्यांची धरपकड करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. अनेक शेतकरी नेत्यांविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. या नेत्यांचे पासपोर्ट जप्त करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. घालून दिलेल्या अटी-शर्तींचं पालन न केल्यानं तुमच्याविरुद्ध कारवाई का करू नये, असा सवाल पोलिसांकडून शेतकरी नेत्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी नेत्यांना 3 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.  

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीPoliceपोलिसdelhi violenceदिल्ली