शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Rajya Sabha Deputy Chairman Election: एनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 12:31 IST

हरिवंश नारायण सिंह यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिनंदन

नवी दिल्ली: राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी एनडीएच्या हरिवंश नारायण सिंह यांची निवड झाली आहे. संयुक्त जनता दलाचे राज्यसभेचे खासदार असलेल्या हरिवंश सिंह यांनी काँग्रेसचे उमेदवार हरिप्रसाद यांचा पराभव केला. हरिवंश सिंह यांना 125 मतं मिळाली, तर हरिप्रसाद 105 मतं मिळवण्यात यश आलं. यावेळी एकूण 222 खासदारांनी मतदान केलं. राज्यसभेचे सभापती असलेल्या व्यंकय्या नायडूंनी हरिवंश सिंह विजयी झाल्याची घोषणा केली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हरिवंश यांच्या खुर्चीजवळ जाऊन त्यांचं अभिनंदन केलं. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनीही हरिवंश सिंह यांचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. 

राज्यसभेच्या उपसभापतीपदाची निवडणूक जिंकण्याइतकं संख्याबळ नव्हतं. आज सकाळी भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यानं हरिवंश सिंह यांना 129 मतं मिळतील, असा विश्वास व्यक्त केला होता. राज्यसभेत एकूण 244 खासदार असून उपसभापतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी 123 मतांची आवश्यकता होती. भाजपाकडे सकाळपर्यंत 121 मतं होती, अशी माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र तरीही अंतिम टप्प्यात भाजपाला काही पक्षांनी पाठिंबा दिल्यानं हरिवंश सिंह यांना 125 मतं मिळाली. राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी दोनवेळा मतदान झालं. पहिल्या मतदानात हरिवंश यांना 115 मतं मिळाली. पहिल्या मतदानावेळी काही मतांची नोंद झाली नव्हती. त्यामुळे दुसऱ्यांदा मतदान घेण्यात आलं. यात हरिवंश यांना 122 मतं मिळाली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आवाहन केल्यानं ओडिशातील बिजू जनता दल, तमिळनाडूतील अण्णा द्रमुक, तेलंगणातील टीआरएस या पक्षांनी हरिवंश यांना मतदान केलं. त्यामुळे काँग्रेसच्या आशा-अपेक्षांना सुरुंग लागला. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाBJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक