शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

Rajasthan Assembly Election Results : राजस्थानात कोमेजलं कमळ; जनतेनं केलं काँग्रेसला जवळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 3:06 PM

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रसने बहुमताकडे वाटचाल केली आहे. दुपारी १.३० पर्यंत काँग्रेसने ९६ जागांवर आघाडी घेतली आहे, तर भाजपाचा रथ ८० जागांवर थांबलेला दिसून आला.

सुहास शेलार

जयपूर - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रसने बहुमताकडे वाटचाल केली आहे. दुपारी १.३० पर्यंत काँग्रेसने ९६ जागांवर आघाडी घेतली आहे, तर भाजपाचा रथ ८० जागांवर थांबलेला दिसून आला. बसपा ३, तर अपक्ष २० जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा काँग्रेसला सत्ता स्थापनेची संधी चालून आली आहे. शिवाय गेल्या पंचवीस वर्षांपासूनची सत्ताबदलाची परंपरा राजस्थानी जनतेने कायम राखली आहे.

बेरोजगारी, आरक्षण, कर्जमाफी या मुद्द्यांवरून राजस्थानातील सर्वसामान्य जनता विद्यमान वसुंधरा राजे सरकारवर नाराज आहे. याचा परिणाम थेट मतदानावर दिसून आला. शिवाय वसुंधरा राजे यांच्या एकछत्री कारभाराला कंटाळून पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनी केलेली बंडखोरी भोवल्यामुळेच भाजपावर पराभवाची नामुष्की ओढवली आली आहे. भाजपाने यंदा ८० हून अधिक विद्यमान आमदार आणि ४ माजी मंत्र्यांना तिकिट नाकारले. त्यामुळे ऐनवेळी त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यामुळे मोठ्या प्रमाणात मतांचे ध्रुवीकरण झाले. आणि त्याचा फायदा काँग्रेसला झाला.

राजकीय विश्लेषक सांगतात, वसुंधरा राजे यांच्या संमती शिवाय राजस्थानच्या मंत्रिमंडळातून एकही फाईल पुढे सरकत नव्हती. त्यामुळे ग्रामीण भागातील विकासकामांना मोठ्या प्रमाणात खीळ बसली होती. साहजिकच याचा फटका भाजपाच्या आमदारांना बसत होता. त्यामुळे स्वपक्षीय आमदारच राजे यांच्या कारभारावर नाराज होते. शिवाय २०१३ च्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात वसुंधरा राजे यांना मोठ्या प्रमाणात अपयश आले. रोजगार, आधुनिक शिक्षणाच्या सुविधा पुरवण्यात असमर्थ ठरल्यामुळे राजस्थानच्या गल्ली गल्लीत नवयुवक ‘मोदी तुझसे बैर नहीं, रानी तेरी खैर नहीं’ अशा घोषणा देत होते. याचाही परिणाम मतदानावर झालेला दिसून आला.

भाजपाने यंदाच्या निवडणुकीत राजस्थानात विकासाच्या मुद्द्याला बगल देत हिंदुत्वाचा अजेंडा हाती घेतला. उमेदवारी यादीतूनही हिंदुत्त्वाचीच झलक दिसून आली. भाजपाने आपल्या यादीत एकाही मुस्लीम उमेदवाराला स्थान दिले नाही. अगदी शेवटच्या क्षणाला यादीत फेरबदल करीत विद्यमान परिवहन मंत्री युनुस खान यांना संधी देण्यात आली. मात्र, दुपारपर्यंत युनुस खान ९ हजार मतांनी पिछाडीवर होते. काँग्रेसचे संभाव्य मुख्यमंत्री सचिन पायलट यांना आव्हान देण्यासाठीच युनुस खान यांचा बळी देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

२०१३च्या निवडणुकीत भाजपाने १६३ जागा जिंकत काँग्रेसचे पानीपत केले होते. त्यावेळी काँग्रेला केवळ २१ जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजस्थानातील सर्व २५ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. राजस्थानी मतदारांचा तेव्हाचा कल पाहता भाजपा पुढची दहा वर्षे तरी सत्तेवर राहील, असे अंदाज होते. मात्र, वर्तमान निकाल पाहता राजस्थानसारखे मोठे राज्य हातातू निसटणे ही आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपासाठी धोक्याची घंटा आहे.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा