शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

केंद्राच्या कृषी कायद्यांविरुद्ध राजस्थानही झाले आक्रमक, विधानसभेच्या अधिवेशनात विधेयक आणणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 3:55 AM

अध्यक्षस्थानी गेहलोत होते. ते म्हणाले, केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी संबंधित विषयांवर बनवलेल्या तीन नव्या कायद्यांचा राज्यात शेतकऱ्यांवर होणाऱ्या परिणामांची चर्चा केली गेली.

जयपूर : केंद्र सरकारने नुकत्याच संमत केलेल्या कृषी विधेयकांविरुद्ध राजस्थान सरकार विधेयक आणील व त्यासाठी लवकरच विधानसभेचे विशेष अधिवेशनही बोलावले जाईल, असे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी गेहलोत होते. ते म्हणाले, केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी संबंधित विषयांवर बनवलेल्या तीन नव्या कायद्यांचा राज्यात शेतकऱ्यांवर होणाऱ्या परिणामांची चर्चा केली गेली. बैठकीनंतर प्रसिद्धीस दिलेल्या सरकारी निवेदनानुसार मंत्रिमंडळाने राज्याच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी लवकरच विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेतला गेला. गेहलोत यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, ‘आज पंजाबच्या काँग्रेस सरकारने या कायद्यांविरुद्ध विधेयक संमत केले आणि राजस्थानही लवकरच तसेच करील.’ निवेदनानुसार, बैठकीत शेतमाल किमान आधारभूत किमतीवर विकत घेण्याच्या अनिवार्यतेवर भर दिला गेला. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पीक खरेदीत वाद झाल्यास तो सोडवण्यासाठी दिवाणी न्यायालयाचे अधिकार देण्यावरही चर्चा केली. कृषी कायदे लागू झाल्यानंतर आवश्यक वस्तू अधिनियमांतर्गत सामान्य परिस्थितीत विभिन्न कृषी वस्तू साठवून ठेवण्याची मर्यादा हटवल्यास काळाबाजार वाढणे, अनधिकृत साठवणूक आदीची शक्यता  आहे, असेही त्यात म्हटले. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानagricultureशेतीCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकार