शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
3
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
4
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
5
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
6
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
7
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
8
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
9
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
10
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
11
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
12
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
13
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
14
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
15
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
16
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
17
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
18
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
19
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
20
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 20:52 IST

Rahul Gandhi on Pahalgam Attack: हा फक्त हल्ला नसून, एक निर्दयी नरसंहार आहे. हा भारताच्या आत्म्यावर हल्ला आहे.

Rahul Gandhi on Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा कठीण काळात सर्व विरोधक सरकारच्या बाजूने आले आहेत. दरम्यान, आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्वरित आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे.

संपूर्ण विरोधी पक्ष सरकारसोबत 

केंद्र सरकारच्या जातीय जनगणनेच्या निर्णयानंतर राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत म्हटले की, हा फक्त हल्ला नसून, एक निर्दयी नरसंहार आहे. हा भारताच्या आत्म्यावर हल्ला आहे. यासाठी जबाबदार असलेल्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. सरकारने वेळ वाया घालवू नये, तात्काळ आणि कठोर कारवाई करावी. या कठीण काळात संपूर्ण विरोधी पक्ष सरकारसोबत उभा आहे. आता पंतप्रधान मोदींनी निर्णायक पाऊल उचलावे, असेही ते यावेळी म्हणाले.

राहुल गांधी पुढे म्हणतात, मी या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना भेटलो. ते म्हणाले की, आमची मुले शहीद झाली, पण आम्हाला फक्त हौतात्म्याचे नाटक दाखवले जात आहे. त्यांचे हे शब्द खूप गंभीर आहेत. यावरुन असे दिसून येते की, लोकांचा सरकारवरील विश्वास डळमळीत होत आहे. इतके लोक मारले गेले, हे कदापी मान्य नाही. ज्यांनी हे कृत्य केले, त्यांना योग्य शिक्षा देणे गरजेचे आहे. पंतप्रधानांना कुठलाही उशीर न करता थेट कारवाई करावी.  

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा