शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

Bihar Assembly Election 2020 : बिहारमधील जवान शहीद झाले, तेव्हा मोदी काय करत होते? राहुल गांधी यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 5:11 AM

राहुल गांधी यांनी या राज्यातील हिसुआ येथे शुक्रवारी पहिली प्रचारसभा घेतली. गलवान येथे चिनी सैनिकांबरोबरील संघर्षात बिहारमधील काही लष्करी जवानही शहीद झाले होते.

पाटणा : गलवानमध्ये चिनी सैनिकांबरोबर झालेल्या संघर्षात बिहारमधील जवानही शहीद झाले; पण त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमके काय करीत होते असा भेदक सवाल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. 

राहुल गांधी यांनी या राज्यातील हिसुआ येथे शुक्रवारी पहिली प्रचारसभा घेतली. गलवान येथे चिनी सैनिकांबरोबरील संघर्षात बिहारमधील काही लष्करी जवानही शहीद झाले होते. अशा शूर व्यक्तींना सैन्यात पाठविणाऱ्या बिहारच्या लोकांना मोदी यांनी शुक्रवारी घेतलेल्या प्रचारसभेत अभिवादन केले. त्या अनुषंगाने राहुल गांधी म्हणाले की, चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. मात्र, ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी का नाकारली, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. २ कोटी लोकांना नोकऱ्या देऊ असे आश्वासन मोदी यांनी गेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी दिले होते. 

कोरोना साथीच्या काळात अनेक बिहारी मजूर शेकडो मैल चालत आपल्या राज्यात परतले. मोदी फक्त अदानी व अंबानी यांच्यासाठीच काम करतात, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. 

नोकऱ्यांचे आश्वासन फसवेबिहारमधील लोकांना १९ लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. प्रत्येकाच्या बँक खात्यात सरकार १५ लाख रुपये जमा करण्याच्या मोदी सरकारने दिलेल्या आश्वासनासारखेच हेही फसवे आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीBiharबिहारElectionनिवडणूक