शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

इस्रोच्या मदतीने ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 4:50 AM

भारतातील बहुतांश पुरातत्वीय स्मारक, वास्तू या शहरांपासून लांब, दुर्गम भागांमध्ये आहेत. त्यांचे जतन करण्यास सरकारी यंत्रणा अपुरी पडते.

- नितीन नायगावकर नवी दिल्ली : भारतातील बहुतांश पुरातत्वीय स्मारक, वास्तू या शहरांपासून लांब, दुर्गम भागांमध्ये आहेत. त्यांचे जतन करण्यास सरकारी यंत्रणा अपुरी पडते. त्यामुळे राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने २०१६ मध्ये इस्रोेशी करार करून सॅटेलाईटद्वारे पुरातत्वीय वारशांना संरक्षण दिले. परिणामी, पुरातत्व सर्वेक्षणच्या अखत्यारीतील ३,६०० वास्तूंवर नियंत्रण ठेवणे इस्रोमुळेच शक्य होत आहे.प्रत्येक राज्यात काही ऐतिहासिक वास्तू केंद्रे, तर काही राज्ये सरकारच्या अखत्यारीत आहेत. बरीच मंदिरे, गड-किल्ले अतिक्रमणाच्या विळख्यातून गेल्या काळात सोडविण्यात आली आहेत; पण वस्ती वाढ व घरांची उंची वाढल्याने ऐतिहासिक वारशाचे महत्त्व राखण्यास अडथळा येतो. उंचावरील किंवा तळघरातील वास्तूंना त्याचा धोका नाही; पण गावांच्या मधोमध वा अगदी शहरांलगतच्या वास्तूंना नक्कीच आहे. या वास्तूंच्या शंभर मीटर परिसरात बांधकामास बंदी असली तरीही यावर नियंत्रण ठेवणे अवघड जात असल्याने केंद्र सरकारने २०१० मध्ये राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाची स्थापना केली. त्यामुळे इस्रोेद्वारे या सर्व स्मारकांना संरक्षण देण्यात आले.आता राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर भुवन अ‍ॅपद्वारे इस्रोच्या पोर्टलवर जाता येते. या पोर्टलवर ३,६०० पैकी कुठल्याही स्मारकाच्या कक्षा पाहता येतात. शंभर मीटरच्या कक्षेतील घर पाडून नवे घर बांधता येत नाही. जुन्याच घरात बदल करण्याची परवानगी आहे, तर तीनशे मीटरच्या कक्षेतील घरांना कुठलेही बांधकाम करायचे असेल, तर स्मारक प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते. पूर्वी परवानगीसाठीही एक वर्ष लागायचे. आता आॅनलाईन सुविधेमुळे अवघ्या महिनाभरात कार्यवाही होते. दरवर्षी सुमारे एक हजार अर्ज येतात, असे प्राधिकरणाचे सदस्य सचिव नवनीत सोनी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.>मुख्य सचिवांना पत्रराष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाची आॅनलाईन यंत्रणा अवलंबण्यासाठी प्राधिकरणाने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे.ऐतिहासिक स्मारकाच्या परिसरात राहणाऱ्यांना घराच्या बांधकामाची परवानगी घेण्यासाठी पारंपरिक यंत्रणेशिवाय दुसरा पर्याय नाही, असे नवनीत सोनी म्हणाले.>सध्या मुंबई व दिल्ली या दोनच शहरांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्राधिकरणाची आॅनलाईन यंत्रणा स्वीकारली आहे. येत्या काळात पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, झारखंड, गुजरात, उत्तर प्रदेश ही राज्येही जुळणार आहेत.

टॅग्स :isroइस्रो