शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

पंतप्रधान मोदींनी वाजपेयींचा विक्रम मोडला, ठरले सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारे बिगर काँग्रेसी पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 17:21 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाला 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळाला. त्यांनी 26 मे 2014 रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यानंतर 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला आणखी मोठा विजय मिळाला आणि नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले.

ठळक मुद्देमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आपला संपूर्ण कार्यकाळ मिळून 2,268 दिवस देशाचे पंतप्रधान होते.पंडित जवाहरलाल नेहरू, हे सर्वाधिक काळ देशाचे पंतप्रधान राहिले आहेत.गुलजारी लाल नंदा यांच्या नावावर सर्वात कमी काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम

नवी दिल्ली - पंतप्रधाननरेंद्र मोदी हे गुरुवारी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना मागे टाकत सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारे बिगर काँग्रेसी पंतप्रधान ठरले आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आपला संपूर्ण कार्यकाळ मिळून 2,268 दिवस देशाचे पंतप्रधान होते. ते आतापर्यंत सर्वाधिक काळ देशाच्या पंतप्रधान पदावर राहणारे एकमेव बिगर-काँग्रेसी पंतप्रधान होते. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बाबतीत गुरुवारी त्यांना मागे टाकले आहे.

26 मे 2014 पासून पंतप्रधान आहेत मोदी -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाला 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळाला. त्यांनी 26 मे 2014 रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यानंतर 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला आणखी मोठा विजय मिळाला आणि नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले.

कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान - अटल बिहारी वाजपेयी -वाजपेयी 3 वेळा भारताचे पंतप्रधान झाले. ते पहिल्यांदा 1996 मध्ये पंतप्रधान झाले. मात्र, त्यांना बहुमत सिद्ध करता आले नाही. यानंतर ते 1998 आणि 1999 मध्ये पंतप्रधान झाले आणि 2004 पर्यंत सत्तेवर होते. आपला कार्यकाळ पूर्ण करणारे वाजपेयी हे पहिले बिगर-काँग्रेसी पंतप्रधान ठरले. 

जवाहर लाल नेहरू सर्वाधिक काळ राहिले पंतप्रधान -पंडित जवाहरलाल नेहरू, हे सर्वाधिक काळ देशाचे पंतप्रधान राहिले आहेत. ते तब्बल 16 वर्षे 286 दिवस पंतप्रधान पदावर कार्यरत होते. तर दुसरा नंबर त्यांची मुलगी इंदिरा गांधी यांचा लागतो. त्या 15 वर्षे 350 दिवस देशाच्या पंतप्रधान होत्या. 

गुलजारी लाल नंदा यांच्या नावावर सर्वात कमी काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम -सर्वात कमी काळ भारताच्या पंतप्रधान पदावर राहण्याचा विक्रम गुलजारी लाल नंदा यांच्या नावावर आहे. लाल बहादुर शास्त्री यांच्या निधनानंतर ते 11 जानेवारी 1966 पासून ते 24 जानेवारी 1966 पर्यंत 13 दिवसांपर्यंत हंगामी पंतप्रधान होते. यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतरही ते 27 मे 1964 ते 9 जून 1964 पर्यंत हंगामी पंतप्रधान होते. 

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस

CoronaVirus vaccine News: फक्त 18 ते 60 वर्षांच्या आतील लोकांनाच दिली जाणार रशियन कोरोना लस, हे आहे मोठं कारण

CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर

कोरोनावरील उपचारांचा खर्च..., मुळीच घाबरू नका; 'कोरोना कवच' घ्या! मिळेल असा फायदा

CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस

व्वा! : भारतासह 'या' देशांत तयार होतेय नाकातून टाकता येणारी कोरोना लस, असं करते काम

दारू सोडण्यासाठी वापरलं जाणारं औषध, आता कोरोनाविरोधात ठरणार उपयोगी; वैज्ञानिकांचा दावा

CoronaVirus vaccine : 50 टक्के प्रभावी ठरली तरी लोकांना दिली जाणार कोरोना लस

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानIndiaभारतGujaratगुजरातBJPभाजपाcongressकाँग्रेसAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूIndira Gandhiइंदिरा गांधी