शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
2
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
3
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
4
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
5
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
6
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
7
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
8
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
9
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
10
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
11
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
12
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
13
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
14
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
15
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
16
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
17
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
18
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
19
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
20
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

देशातील ३0३ मतदारसंघांमध्ये पूर्ण झाले मतदान; ईव्हीएमविषयी सर्वत्र तक्रारी, बंगालमध्ये हिंसाचार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 6:26 AM

तिसऱ्या टप्प्यात बड्या नेत्यांचे भवितव्य मतदान यंत्रांमध्ये बंद; केरळमध्ये मतदानाच्या रांगेत चार जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी मतदानाच्या वेळी प्रत्येक राज्यात ईव्हीएमविषयीच्या तक्रारी आल्या, तर केरळात व्हीव्हीपॅटमधून साप निघाल्याने कर्मचारी व मतदारांची धावपळ झाली. केरळातच मतदानाच्या रांगेत चौघांचा मृत्यू झाला आणि पश्चिम बंगालमध्ये भाजप व तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मारामारी झाली. त्यात गावठी बॉम्ब फेकण्यात आला आणि हाणामारीत एका मतदाराचा मृत्यू झाला. पण अशा स्थितीतही ११७ मतदारसंघांतील तब्बल ६६ टक्के लोकांनी मतदान केले.आतापर्यंतच्या तीन टप्प्यांत मिळून लोकसभेच्या निम्म्याहून अधिक म्हणजे ३0३ मतदारसंघांत मतदान पूर्ण झाले आहे. यापुढील चार टप्प्यांत २४0 मतदारसंघांत मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील उरलेल्या १८ मतदारसंघांमध्येही २९ एप्रिल रोजी मतदान होईल. राज्यातील ३0 मतदारसंघांत दोन टप्प्यांत मतदान पूर्ण झाले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, अध्यक्ष अमित शहा, समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह व अखिलेश यादव, शरद यादव, मुख्तार अब्बास नकवी, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, शशी थरुर आदींनी मतदान केले.अमित शहा, मुलायम सिंह, मेहबुबा मुफ्ती, थरुर आदींचे राजकीय भवितव्य आज मतदान यंत्रांत बंद झाले. नवीन पटनायक, पी. विजयन, विजय रूपाणी आदी मुख्यमंत्र्यांनीही आज मतदान केले. दक्षिणेकडील तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या पाच राज्यांतील सर्व मतदानसंघांतील मतदान आता पूर्ण झाले आहे.गोवा, पश्चिम बंगाल, आसाम व त्रिपुरा या चार राज्यांत ८0 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला त्या तुलनेत बिहार, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये कमी मतदान झाले. कडक उन्हाचाही परिणाम काही राज्यांत झाला. मतदानाच्या वेळी मंगळुरूमध्ये जोरदार पाऊ स सुरू झाल्याने मतदारांची एकच तारांबळ उडाली. पहिल्या दोन टप्प्यांपेक्षा तिसऱ्या टप्प्यांत मतदान यंत्रांविषयी असंख्य तक्रारी आल्या. जवळपास सर्वच राज्यांमध्ये मतदान यंत्रे नीट काम करीत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे काही ठिकाणी ती बदलावी लागली. परिणामी मतदारांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अर्थातच मतदान यंत्रे बिघडल्याचा इन्कार केला. समाजवादी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस यांनीच नव्हे, तर काही ठिकाणी भाजपतर्फेही काही ठिकाणी यंत्रांविषयी तक्रारी करण्यात आल्या.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक