शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
6
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
7
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
8
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
9
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
10
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
11
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
12
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
13
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
14
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
15
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
16
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
17
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
18
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
19
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
20
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
Daily Top 2Weekly Top 5

'राजकीय पक्ष, व्यवसायसमूहाच्या वृत्तपत्रांकडून मूल्यांबाबत तडजोड'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 02:49 IST

‘राजा राममोहन रॉय’ पुरस्काराचे वितरण

नवी दिल्ली : राजकीय पक्ष आणि व्यवसाय समूह आपल्या दुर्हेतूसाठी स्वत:ची वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या सुरू करून पत्रकारितेच्या मूल्यांबाबत तडजोड करीत आहेत, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी शनिवारी केले. पत्रकारांनी सनसनाटीपासून दूर राहिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त ‘प्रेस कौन्सिल आॅफ इंडिया’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात नायडू बोलत होते. पत्रकारितेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ‘राजस्थान पत्रिका समूहा’चे चेअरमन आणि ‘एडिटर इन चीफ’ गुलाब कोठारी यांना उपराष्ट्रपती नायडू यांच्या हस्ते ‘राजा राममोहन रॉय’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

नायडू यांनी सांगितले की, अलीकडे राजकीय पक्ष आणि व्यवसाय समूह आपली स्वत:ची वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या सुरू करीत आहेत. या माध्यमातून ते आपले दुर्हेतू (व्हेस्टेड इंटरेस्ट) साध्य करीत आहेत, तसेच पत्रकारितेच्या मूल्यांबाबत तडजोड करीत आहेत. एखाद्या राजकीय पक्षाकडून वृत्तपत्र चालविले जात असेल, तर तसे त्यांनी स्पष्टपणे नमूदही करायला हवे. सनसनाटीपणाच्या या काळात सतर्क राहण्याचे आवाहन पत्रकारांना करून नायडू यांनी पुढे म्हटले की, सनसनाटी हे जणू आजचे ब्रीदच बनले आहे. तथापि, सनसनाटी बातमी म्हणजे असंवेदनशील बातमी होय. सनसनाटीपासून पत्रकारांनी दूर राहायला हवे.

खोट्या बातम्या ही मोठी समस्या -जावडेकर
माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांची या कार्यक्रमास उपस्थिती होती. जावडेकर यांनी खोट्या बातम्यांबाबत चिंता व्यक्त केली. जावडेकर म्हणाले की, आज ‘पेड न्यूज’पेक्षाही ‘फेक न्यूज’ ही मोठी समस्या बनली आहे. पत्रकारांनी आपल्या स्वातंत्र्याबरोबरच जबाबदारीही समजून घेण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू