शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

आता तारखा दहशतवादी नव्हे, आपण ठरवतो- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 3:08 PM

पंतप्रधान मोदींकडून प्रचारात पुन्हा कलम ३७० चा मुद्दा उपस्थित

इलेनाबाद: जम्मू काश्मीरमध्ये काय होणार, कोणत्या दिवशी काय घडणार, हे आधी फुटिरतावादी, दहशतवादी आणि बाजूच्या देशातली काही माणसं ठरवायची. मात्र आता सर्व काही आपण ठरवतो, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कलम ३७० चा विषय काश्मीरसाठी महत्त्वाचं असल्याचं म्हटलं. पंतप्रधान पदाची खुर्ची येत जात राहते. मात्र काश्मीर टिकायला हवं, असं मोदी म्हणाले. ते हरयाणातील प्रचारसभेत बोलत होते. हरयाणाची निवडणूकदेखील महाराष्ट्रासोबत आहे.आधीच्या सरकारच्या काळात काश्मीरमध्ये कधी काय घडणार, याचं कॅलेंडर दहशतवादी ठरवायचे. रविवारी, सोमवारी, मंगळवारी, बुधवारी काय होणार. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये कोणत्या घडामोडी घडणार, याचं संपूर्ण कॅलेंडर फुटिरतावादी, दहशतवाद्यांकडे असायचं. त्यांच्याकडून सर्व तारखा निश्चित केल्या जायच्या. मात्र आता ते तारखा ठरवत नाहीत. तर आपण ठरवतो. आपली धोरणं आपण ठरवतो. आता ते आपलं भाग्य ठरवणार नाहीत. कारण देश बदलला आहे, अशा शब्दांत मोदींनी प्रचारात कलम ३७० चा मुद्दा उपस्थित केला. आधी शेजारच्या देशातून आलेल्या इशाऱ्यांवर काश्मीरमध्ये घडामोडी व्हायच्या. तिथून सूत्रं हलली की काश्मीरमध्ये खेळ सुरू व्हायचा. आपले जवान शहीद व्हायचे. तिरंग्याला आग लावली जायची. तो पायदळी तुडवला जायचा. कारण काश्मीरमधील दोन कुटुंबाना मनमानी करायला दिली की तिथली परिस्थिती नियंत्रणात राहील, असं दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांना वाटायचं. दोन कुटुंबांनी काश्मीरला लुटलं तरी चालेल, अशी तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांची मानसिकता होती. मात्र काश्मीर असं धगधगतं ठेवता येणार नाही. पंतप्रधानपद येत जात राहील. पण काश्मीर टिकायला हवं, असं मोदी म्हणाले. 

टॅग्स :HaryanaहरयाणाNarendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370