शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

वाजपेयी महाभेसळ सरकार चालवत होते का?; काँग्रेसचा मोदींवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 9:49 AM

विरोधकांच्या एकीवर टीका करणाऱ्या मोदींवर काँग्रेसचा हल्लाबोल

नवी दिल्ली: विरोधकांच्या एकीला महाभेसळ म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनाकाँग्रेसनं प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधक एकत्र आल्यावर मोदी त्यांना महाभेसळ म्हणतात. मग महाआघाडीचं नेतृत्त्व करुन तीन वेळा सरकार स्थापन करणाऱ्या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी महाभेसळीचं नेतृत्त्व केलं होतं, असं म्हणायचं का, असा सवाल माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते मनीष तिवारींनी उपस्थित केला. शुक्रवारी छत्तीसगडच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी जनसभेला संबोधित करताना विरोधकांच्या वाढत्या जवळिकीवरही शरसंधान साधलं. लोकांनी महाभेसळीपासून सावध राहावं, असं आवाहन त्यांनी केलं. यावरुन काँग्रेसनं मोदींवर जोरदार पलटवार केला. 40-42 पक्षांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं नेतृत्त्व करणारे मोदीच महाभेसळीचे म्होरके आहेत, अशा शब्दांमध्ये काँग्रेस नेते मनीष तिवारींनी पंतप्रधानांना लक्ष्य केलं.दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आघाडी सरकाराचा संदर्भ देत काँग्रेसनं मोदींवर तोफ डागली. '1996, 1998 आणि 1999 मध्ये महाआघाडीचं सरकार चालवणारे अटल बिहारी वाजपेयी यांनी महाभेसळीचं नेतृत्त्व केलं होतं का?', असा प्रश्न तिवारींनी उपस्थित केला. 'आज वाजपेयींचा अंतरात्मा रडत असेल. त्यांचं सरकार महाभेसळीचं सरकार होतं का, असा प्रश्न आम्ही विचारु इच्छितो. या प्रश्नाचं उत्तर मोदींनी द्यावं,' असं तिवारी म्हणाले. मोदींवर हल्लाबोल करताना मनीष तिवारींनी इतिहासाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 'या देशात आघाडी सरकारची प्रक्रिया कोणी सुरू केली? व्ही. पी. सिंग यांना कोणी पाठिंबा दिला? 1996 मध्ये 13 दिवसांचं सरकार कोणाच्या समर्थनामुळे स्थापन झालं? आघाडी महाभेसळ आहे, असं मोदी म्हणतात. मग एनडीएमध्ये इतर पक्ष नाहीत का? मोदी एनडीएचं नेतृत्व करतात. एनडीएमध्ये 40-42 पक्ष आहेत. त्यामुळे मोदी महाभेसळीचं म्होरके ठरतात,' अशा शब्दांमध्ये तिवारींनी मोदींचा समाचार घेतला.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीcongressकाँग्रेसBJPभाजपा