शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

इंधनाचा तुटवडा जाणवतोय, पण भारतात लॉकडाऊन लागणार नाही, ही आहेत ५ कारणं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 19:36 IST

Petrol, LPG Gas Crisis: इराण युद्धामुळे पुरवठा साखळी तुटल्याने संपूर्ण जगामध्ये इंधन टंचाई जाणवू लागली आहे. तसेच अनेक देशांमध्ये लॉकडाऊन किंवा ऊर्जा आणीबाणी लावण्याची वेळ आली आहे. भारतातही काही प्रमाणात इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. मात्र असं असलं तरी भारतात लॉकडाऊन लागण्याची शक्यता नाही आहे.

इराण युद्धामुळे पुरवठा साखळी तुटल्याने संपूर्ण जगामध्ये इंधन टंचाई जाणवू लागली आहे. तसेच अनेक देशांमध्ये लॉकडाऊन किंवा ऊर्जा आणीबाणी लावण्याची वेळ आली आहे. भारतातही काही प्रमाणात इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. मात्र असं असलं तरी भारतात लॉकडाऊन लागण्याची शक्यता नाही आहे. त्याची पाच कारणं आता समोर येत आहेत.

भारतात लॉकडाऊन न लागण्यामागचं पहिलं कारण आहे ते म्हणजे, भारताकडे तेल आणि गॅसचा पुरेसा बफर स्टॉक आहे. तसेच सरकारकडून याबाबत देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार भारताकडे ६० दिवसांचा तेलसाठा उपलब्ध आहे. सरकारी तेल कंपन्यांकडे असलेला तेलसाठा आणि सरकारकडील स्ट्रॅटर्जिक पेट्रोलियम रिझर्व्हमधील साठा मिळून भारताची साठवणुकीची क्षमता ६० ते ७० दिवसांची आहे. त्यामुळे इंधन टंचाईमुळे सद्यस्थितीत भारतात लॉकडाऊन लागण्याची शक्यता नाही.

दुसरं कारण म्हणजे जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमती वाढत आहेत. त्यामुले तेल कंपन्यांवरील दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील विशेष उत्पादन शुक्लामध्ये १० रुपयांनी कपात केली आहे. त्यामाध्यमातून कंपन्यांना होणारा तोटा कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आता युद्ध आणखी लांबलं तर सरकार आणखी कपात करून कंपन्यांवरील ओझं आणखी हलकं करू शकतं. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता कमी आहे. सरकार आपला नफा कमी करून जनतेवर पडणारा भार थांबवू शकतं. 

तिसरं कारण - भारताने इराणसोबत मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून होर्मुझची सामुद्रधुनी आपल्यासाठी खुली करून घेतली आहे. इराणनेही भारतासह एकूण पाच देशांसाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीचा मार्ग खुला केला आहे. याचाच अर्थ येत्या काही दिवसांमध्ये भारताच्या जहाजांना होर्मुझमधून प्रवास करण्यास कुठल्याही अडचणी येणार नाहीत. त्यामुळे भारताला होणाऱ्या तेल आणि गॅसच्या पुरवठ्यामधील अडचणी संपुष्टात येतील.

चौथं कारण म्हणजे भारताने आपल्या इंधनाच्या आयातीमध्ये वैविध्य आणलं आहे. भारत सरकारने दिलेल्या माहितीनुसार सध्या भारत ४१ देशांकडून खनिज तेलाची खरेदी करतो. तर कतार, कुवेत, सौदी अरेबिया या आखाती देशांसोबतच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, रशिया, अर्जेंटिना आदी देशांकडून एलपीजीची आयात वाढवण्यात आली आहे. या माध्यमातून भारताने आखाती देशांवरील आपलं अवलंबित्व कमी केलं आहे.

तसेच पाचवं कारण म्हणजे भारताने ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी सुरुवातीलाच कठोर पावलं उचलली आहे. एलपीजीवर ईसीए लागू करून मागणी मर्यादित करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच साठेबाजी आणि काळ्या बाजाराविरोधात कठोर पावलं उचलण्यात आली आहेत. तसेच घरगुती गॅसची मागणी पूर्ण करण्यासाठी व्यावसायिक सिलेंडरचं रेशनिंग सुरू केलं आहे. मात्र आता व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठाही ७० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तसेच सरकारकडून पीएनजीच्या वापराला प्रोत्साहन दिलं जात आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : No lockdown in India despite fuel shortage: Five reasons why.

Web Summary : Despite global fuel shortages, India won't face a lockdown. Ample oil reserves, government tax cuts, diversified imports, Iran deal, and proactive measures ensure energy security. The government is also promoting PNG usage.
टॅग्स :LPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईPetrolपेट्रोलIndiaभारत