शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

CoronaVirus: बिहारमध्ये कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू, पण ७८९ जणांवर अंत्यसंस्कार!; हायकोर्टही हैराण 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 4:30 PM

CoronaVirus: पाटणा उच्च न्यायालयात दाखल करण्यात अहवालामुळे न्यायालयही संभ्रमात पडल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देबिहारमध्ये कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू, पण ७८९ जणांवर अंत्यसंस्कार!हायकोर्टही झाले हैराण मुख्य न्यायधीश संजय करोल यांची तीव्र नाराजी

पाटणा: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नव्या कोरोनाबाधितांची संख्या काही अंशी घटताना दिसत असली, तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या चिंता वाढवणारी आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येत असून, कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांचा तुटवडा जाणवत आहे. अशातच देशातील विविध न्यायालयांमध्ये कोरोनासंदर्भातील याचिकांवर सुनावणी सुरू असून, पाटणा उच्च न्यायालयात दाखल करण्यात अहवालामुळे न्यायालयही संभ्रमात पडल्याची माहिती समोर आली आहे. (patna high court slams state govt over figures death in buxar due to coronavirus)

कोरोना संकटाच्या काळात बिहारमधील गंगा नदीत आढळलेल्या मृतदेहांमुळे देशभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे बिहारमधील बक्सर भागात कोरोनाच्या परिस्थितीबाबत दाखल केलेल्या एका अहवालामुळे पाटणा उच्च न्यायालयही हैराण झाले असून, मुख्य न्यायधीश संजय करोल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

राज्यात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम राहणार? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

नेमका कोणता अहवाल खरा?

कोरोनासंदर्भात झालेल्या एका याचिकेवरील सुनावणीवेळी मुख्य सचिवांनी दाखल केलेल्या अहवालानुसार, बक्सर भागात १ ते १३ मे या कालावधीत ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र, प्रभागीय आयुक्तांनी दाखल केलेल्या अहवालानुसार, ५ ते १४ मे या कालावधीत ७८९ जणांवर अत्यंसंस्कार करण्यात आले. या दोन्ही रिपोर्टबाबत उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या दोन्ही रिपोर्टपैकी नेमका खरा रिपोर्ट कोणता, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली आहे. यावर, महाधिवक्त्यांनी पुन्हा एकदा आकडेवारी सादर करण्यासाठी वेळ मागितला आहे. 

चिंतेत भर! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २६९ डॉक्टरांनी गमावला जीव; बिहारमध्ये सर्वाधिक मृत्यू

गंगा नदीतील मृतदेहांवर अंत्यसंस्कार

बक्सर भागात वाहणाऱ्या गंगा नदीत आढळून आलेल्या मृतदेहांसंदर्भात बिहार राज्याने हात वर केले असून, हे मृतदेह उत्तर प्रदेशातून आल्याचे म्हटले होते. मात्र, यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सरकारला उत्तर देण्यास सांगितले होते. दुसरीकडे, बक्सर भागात १० मे रोजी सर्वाधिक १०६, तर ५ मे रोजी १०२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

“देशात कोणाच्याही जीवाची किंमत राहिलेली नाही”; रवीश कुमारांचे PM मोदींवर टीकास्त्र

योगी सरकारलाही न्यायालयाने फटकारले

उत्तर प्रदेशातील छोटी शहरे आणि ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था राम भरोसे असल्याचे सांगत योगी सरकारला फटकारले. अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्या. अजित कुमार आणि न्या. सिद्धार्थ वर्मा यांच्या खंडपीठाने योगी सरकारला धारेवर धरले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसBiharबिहारNitish Kumarनितीश कुमारHigh Courtउच्च न्यायालयState Governmentराज्य सरकार