शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 12:52 IST

Operation Sindoor: २२ मे 'ऑपरेशन महादेव' सुरू केले, याद्वारे पहलगामच्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

Operation Sindoor: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत महत्वाची माहिती दिली. पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर गोळीबार करणाऱ्या ३ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. सुरक्षा दलांनी 'ऑपरेशन महादेव' अंतर्गत ही कारवाई केली. गृहमंत्र्यांनी या संपूर्ण कारवाईची सविस्तर माहिती सभागृहात दिली.

पहलगामचे हल्लेखोर ठार झालेऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शहा म्हणाले की, "पहलगाममध्ये धर्म विचारुन निष्पाप पर्यटकांची क्रूर हत्या करण्यात आली, मी याचा तीव्र निषेध करतो आणि मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. या हल्ल्यातील दहशतवाद्यांना पकडण्यासाठी अथवा ठार करण्यासाठी सुरक्षा दलांनी २२ मे 'ऑपरेशन महादेव' सुरू केले होते. या कारवाईत पहलगाममधील तिन्ही दहशतवादी मारले गेले. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोन स्थानिकांनाही पकडण्यात आले आहे," अशी माहिती त्यांनी दिली.

दहशतवाद्यांकडून पाकिस्तानी शस्त्रे जप्त गृहमंत्री पुढे म्हणाले, "२२ मे रोजी आयबीला दाचीगाम परिसरात दहशतवादी लपल्याची गुप्तचर माहिती मिळाली होती. या माहितीची पुष्टी करण्यासाठी मे ते २२ जुलै पर्यंत सतत प्रयत्न केले गेले. २२ जुलै रोजी सेन्सर्सद्वारे दहशतवाद्यांच्या उपस्थितीची पुष्टी झाली. त्यानंतर पोलिस आणि लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांना घेरले. सुलेमान, जिब्रान आणि अफझल असे ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. जम्मू-काश्मीर पोलिस, सीआरपीएफ आणि सैन्याने ही कारवाई केली. दहशतवाद्यांकडून तीन रायफल जप्त करण्यात आल्या. पहलगाममध्ये ज्या रायफल्सने हल्ला करण्यात आला होता, त्याच रायफल या आहेत."

'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती

चिदंबरम यांच्या वक्तव्यावरुन शाह संतापले"काल ते (काँग्रेस) आम्हाला विचारत होते की, दहशतवादी कुठून आले आणि त्यासाठी कोण जबाबदार आहे? अर्थात, ही आमची जबाबदारी आहे, कारण आम्ही सरकारमध्ये आहोत. काल या देशाचे माजी गृहमंत्री चिदंबरमजी यांनी हा प्रश्न उपस्थित केला की, हे दहशतवादी पाकिस्तानातून आले आहेत याचा पुरावा काय आहे? ते काय म्हणू इच्छितात? ते कोणाला वाचवू इच्छितात? पाकिस्तानला वाचवून तुम्हाला काय मिळेल? पहलगाम हल्ल्यानंतर लगेचच मी पीडित कुटुंबांना भेटलो होतो. मी माझ्या समोर एक महिला उभी असल्याचे पाहिले, जी तिच्या लग्नाच्या फक्त ६ दिवसांनी विधवा झाली होती - मी ते दृश्य कधीही विसरू शकत नाही. मी आज सर्व पीडित कुटुंबांना सांगू इच्छितो की, मोदीजींनी ऑपरेशन सिंदूरद्वारे त्यांना त्या दहशतवाद्यांना ठार केले आहे," असे शाहांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाAmit Shahअमित शाहParliamentसंसदBJPभाजपाcongressकाँग्रेस