शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
2
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
3
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
4
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
5
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
6
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
7
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
8
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
9
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
10
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
11
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
12
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
13
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
14
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
15
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
16
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
17
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
18
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
19
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?

ओडिशामध्ये जवानांनी 5 नक्षलवाद्यांचा केला खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 10:34 AM

ओडिशातील मलकानगिरीतील कालीमेडा येथे सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये सोमवारी सकाळी चकमक झाली. यामध्ये पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. 

भुवनेश्वर - ओडिशामध्ये नक्षलवाद्यांविरोधात चालवल्या जाणाऱ्या मोहीमेत सुरक्षा दलाच्या जवानांना मोठे यश आले आहे. नक्षलग्रस्त भाग असलेल्या मलकानगिरी जिल्ह्यात झालेल्या चकमकीदरम्यान पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार सकाळी मलकानगिरी जिल्ह्यातील कालीमेडा परिसरात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. नक्षलवाद्यांच्या या हल्ल्याला जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. यादरम्यान, पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. घटनास्थळावरुन जवानांनी 5 हत्यारं आणि एक हँड ग्रेनेड जप्त केले आहे. दरम्यान, परिसरात अजूनही चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत नक्षलवाद्यांचा नेता रणदेबचाही खात्मा झाल्याचे म्हटले जात आहे.

दंतेवाडामध्येही झाली होती चकमक गेल्या आठवड्यात दंतेवाडामध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले होते. दंतेवाडातील अरनपूर पोलीस ठाणे क्षेत्रात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात एका पत्रकाराचा मृत्यू झाला होता. तर काही दिवसांपूर्वी  बीजापूरमध्ये झालेल्या नक्षली हल्ल्यात चार जवान शहीद झाले होते. 

(म्हणे आम्हाला त्या हत्येचं दु:ख; नक्षलवाद्यांनी जारी केलं पत्र)

 

दूरदर्शनच्या कॅमेरामनची हत्याछत्तीसगढच्या जंगलात दूरदर्शनचे कॅमेरामन अच्युतानंद साहू यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली. यानंतर नक्षलवाद्यांनी पत्र जारी केले. साहू वा पत्रकारांशी आपले अजिबात वैर नसून, सुरक्षा दलाच्या जवानांसह ते आले, तर ते मारले जाऊ शकतील, असा इशारा नक्षलवाद्यांनी शुक्रवारी दिला. नक्षलवाद्यांनी एक पत्र प्रसिद्धीस दिले असून, त्यात आमचे पत्रकारांशी काहीच वैर नाही, असे स्पष्ट केले. सुरक्षा दलाच्या जवानांसह कॅमेऱ्यासह आलेले लोक हे पत्रकारांच्या तुकडीचा भाग आहेत, हे आम्हाला माहीत नव्हते. ते सुरक्षा दलाचाच भाग असल्याचे वाटल्यामुळेच त्यांची हत्या झाली, असे त्यात म्हटले आहे. अच्युतानंद साहू ज्या ठिकाणी बसले होते, ते पाहून आम्हाला ते पत्रकार आहेत, हे समजले नाही. ते जवानच आहेत, असे आम्हाला वाटले. त्यामुळे त्यांची हत्या झाली असे नमूद करतानाच, त्यांच्या मृत्यूबद्दल नक्षलवाद्यांनी दु:खही व्यक्त केले आहे. तसेच यापुढे पत्रकारांनी वा त्यांच्या तुकडीने सुरक्षा दलाच्या जवानांसह येऊ नये, असा इशाराही या पत्रात देण्यात आला आहे. तुम्ही एकटे आलात, तर तुमचे इथे स्वागतच केले जाईल, असे त्यांनी म्हटले. 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीOdishaओदिशा