शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
2
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
3
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
4
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
5
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
6
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
7
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
8
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
9
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
10
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
11
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
12
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
13
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
14
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
15
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
16
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
17
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
18
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
19
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?

Notes Ban Anniversary: मनमोहन सिंग म्हणाले, नोटाबंदी हा अपशकुनी निर्णय, जेटलींचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 3:55 PM

सरकारकडून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे.

नवी दिल्ली- दोन वर्षांपूर्वी 8 नोव्हेंबर 2016ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीची घोषणा केली होती. या निर्णयानंतर देशातील 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. आज नोटाबंदीला दोन वर्षं पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा सरकारला लक्ष्य केलं आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह अनेक काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षांनी मोदींवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. तर सरकारकडून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे.मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीच्या निर्णयाला संकुचित विचारांनी घेतलेला अपशकुनी निर्णय, असं संबोधलं आहे. नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्था रसातळाला गेल्याचं आता समोर आलं आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य व्यक्ती प्रभावित झाल्या. मग ते कोणत्या धर्म, जाती किंवा पेशा, संप्रदायाचे असो. असं म्हणतात, एखादी जखम झाल्यास ती भरून निघते, परंतु नोटाबंदीमुळे झालेली जखम दिवसेंदिवस अजून खोलवर जाताना दिसत आहे. नोटाबंदीमुळे जीडीपीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्याचा अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे. छोटे छोटे उद्योगधंदे हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा होता. तो नोटाबंदीमुळे पूर्णतः उद्ध्वस्त झाला. अर्थव्यवस्था दिवसेंदिवस घसरताना पाहायला मिळतेय.तरुणांना नोक-या नाहीत, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी लागणारं कर्ज आणि बँक,  गैर वित्तीय संस्थांवर नोटाबंदीचा दुष्परिणाम झाला आहे. नोटाबंदीमुळेच रुपयाचा स्तर खाली येताना पाहायला मिळतोय, असं मनमोहन सिंग म्हणाले आहेत.तर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी हा निर्णय योग्य असल्याचं सांगितलं आहे. नोटाबंदीला 2 वर्षं पूर्ण झाली आहेत. या निर्णयाचा उद्देश सफल झाला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे काळ्या पैशात कमी आली आहे. तसेच गेल्या दोन वर्षांत इन्कम टॅक्स रिटर्न्समध्ये वाढ झाली आहे. नोटाबंदी हा अर्थव्यवस्थेतील पुनर्बांधणीतले महत्त्वाचे पाऊल असून, लोकांचा कडचा पैसा गोळा करणे हा नोटाबंदीचाही कधीही उद्देश नसल्याचंही अरुण जेटलींनी सांगितलं आहे. त्यांनी ब्लॉग लिहून याची माहिती दिली आहे.

टॅग्स :Note Banनोटाबंदी